शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

बधिर पोलीस : हातवाऱ्यांच्या भाषेला समजले चिथावणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:45 IST

समाजकल्याण कार्यालयासमोर कर्णबधिर विद्यार्थ्यांवर लाठीमार : सर्व स्तरांतून पोलिसांबाबत संताप

पुणे : कर्णबधिर आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांच्या नेत्यांकडून हातवाऱ्यांच्या भाषेद्वारे दिल्या जाणाºया सूचनांना पोलिसांनी चिथावणी समजल्यानेच लाठीमाराचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत, आदेश कोणत्या अधिकाºयाने दिले, कर्णबधिर विद्यार्थी असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्णबधिर विद्यार्थ्यांनी केवळ ‘ठिय्या आंदोलना’ची परवानगी घेतली होती. मोर्चाची परवानगी नव्हती, असे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे; परंतु तरीही कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून का सांगितले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यामध्ये दहा ते बारा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे ‘ठिय्या आंदोलन’ सुरू होते.परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माफक लाठीचार्ज केल्याचा पोलिसांचा दावाआंदोलक कर्णबधिर विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालय याठिकाणी मोर्चा काढला होता. साधारण हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांचा तो जमाव होता. मुळातच त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधावा हे पोलीस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह होते. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली. आंदोलनकर्त्यांमधील एक नेता भिंतीवर चढला. त्याने सांकेतिक भाषेत आपल्या इतर सहकाºयांना येण्यास खुणावले. त्यामुळे ज्याठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते, ते पाडून त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या अंगावर बॅरिकेड पडले. काही ठिकाणी पोलीस खाली पडले. विद्यार्थ्यांना रोखण्याकरिता पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र त्याचा काही उपयोग न झाल्याने त्यांना बळाचा उपयोग करावा लागला. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये याकरिता माफक प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. 

कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून, या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. नोकºया आणि शिक्षण याबाबत येणाºया अडचणी सोडविण्यासाठी राज्यभरातून कर्णबधिर आंदोलक जमले होते. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते मुंबईपर्यंत जाणार होते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करीत होते. त्यांच्या भावना समजावून घेऊन प्रकरण हाताळण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्र्रकाराचा निषेध करावा तितका थोडा आहे.- मोहन जोशी, माजी आमदार