शहरं
Join us  
Trending Stories
1
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
4
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
5
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
6
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
7
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
8
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
9
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
10
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
11
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
12
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
13
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
14
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
15
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
16
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
17
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
18
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
19
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
20
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता

बधिर पोलीस : हातवाऱ्यांच्या भाषेला समजले चिथावणी, विद्यार्थ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:45 IST

समाजकल्याण कार्यालयासमोर कर्णबधिर विद्यार्थ्यांवर लाठीमार : सर्व स्तरांतून पोलिसांबाबत संताप

पुणे : कर्णबधिर आंदोलक विद्यार्थ्यांना त्यांच्या नेत्यांकडून हातवाऱ्यांच्या भाषेद्वारे दिल्या जाणाºया सूचनांना पोलिसांनी चिथावणी समजल्यानेच लाठीमाराचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत, आदेश कोणत्या अधिकाºयाने दिले, कर्णबधिर विद्यार्थी असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कर्णबधिर विद्यार्थ्यांनी केवळ ‘ठिय्या आंदोलना’ची परवानगी घेतली होती. मोर्चाची परवानगी नव्हती, असे पोलिसांतर्फे सांगण्यात येत आहे; परंतु तरीही कोणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून का सांगितले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.यामध्ये दहा ते बारा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांचे ‘ठिय्या आंदोलन’ सुरू होते.परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माफक लाठीचार्ज केल्याचा पोलिसांचा दावाआंदोलक कर्णबधिर विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालय याठिकाणी मोर्चा काढला होता. साधारण हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांचा तो जमाव होता. मुळातच त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद साधावा हे पोलीस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह होते. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि आंदोलनामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाला घ्यावी लागली. आंदोलनकर्त्यांमधील एक नेता भिंतीवर चढला. त्याने सांकेतिक भाषेत आपल्या इतर सहकाºयांना येण्यास खुणावले. त्यामुळे ज्याठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले होते, ते पाडून त्या विद्यार्थ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या अंगावर बॅरिकेड पडले. काही ठिकाणी पोलीस खाली पडले. विद्यार्थ्यांना रोखण्याकरिता पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र त्याचा काही उपयोग न झाल्याने त्यांना बळाचा उपयोग करावा लागला. परिस्थिती आणखी हाताबाहेर जाऊ नये याकरिता माफक प्रमाणात लाठीचार्ज करावा लागला, असे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले. 

कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला निषेधार्ह असून, या असंवेदनशील प्रकाराची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. नोकºया आणि शिक्षण याबाबत येणाºया अडचणी सोडविण्यासाठी राज्यभरातून कर्णबधिर आंदोलक जमले होते. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते मुंबईपर्यंत जाणार होते. लोकशाही मार्गाने ते आंदोलन करीत होते. त्यांच्या भावना समजावून घेऊन प्रकरण हाताळण्याऐवजी त्यांच्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या प्र्रकाराचा निषेध करावा तितका थोडा आहे.- मोहन जोशी, माजी आमदार