शहरं
Join us  
Trending Stories
1
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
2
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
3
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
4
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
5
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
6
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
7
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
8
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
9
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
10
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
11
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
12
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
13
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
14
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
15
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
16
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
17
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
18
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
19
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
20
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
Daily Top 2Weekly Top 5

मृत शेतकऱ्याची पळशीतील साडेपाच एकर जमीन हडपली!

By admin | Updated: December 29, 2014 23:17 IST

३५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्याच्या जागी तोतयाला उभा करून साडेपाच एकर जमीन हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

बारामती : ३५ वर्षांपूर्वी निधन झालेल्या शेतकऱ्याच्या जागी तोतयाला उभा करून साडेपाच एकर जमीन हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पळशी (बारामती) येथे ही फसवणूक झाली असून बारामती दुय्यम निबंधक कार्यालयात दोन वर्षांपूर्वी बनावट दस्त केले आहे. याप्रकरणी शंकर मारुती कोळेकर, रामदास मारुती कोळेकर, प्रमोद शंकर कोळेकर, सयाजी शंकर कोळेकर (सर्व रा. पळशी, ता. बारामती), तसेच ऊर्मिला आबासाहेब लोखंडे (रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मौजे पळशी (ता. बारामती) येथील गट क्रमांक ४ चे मालक जयवंत पांडुरंग महानवर यांचा १५/५/१९७९ साली माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे मृत्यू झाला होता. महानवर कुटुंब मूळचे पळशी (ता. बारामती) येथील आहे. कामानिमित्त ते नातेपुते येथे स्थायिक झाले आहेत. त्याचा फायदा घेऊन वरील आरोपींना तोतयाला उभे करून ती जमीन हडप केली.दोन वर्षांपूर्वी ही बाब उघड झाल्यानंतर मयत जयवंत महानवर यांचा मुलगा छगन जयवंत महानवर यांनी तक्रार केली होती. तक्रारीदरम्यान वडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, बनावट खरेदी दस्त क्रमांक बमत/३५२/२०१२ यासह अन्य महत्त्वाचे कागदपत्रे सादर केली होती. त्याची छाननी केल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी २३ डिसेंबर रोजी फसवणुकीसह बनावट दस्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात प्रमोद कोळेकर आणि सयाजी कोळेकर या दोघांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या. त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे. महानवर कुटुंब उपजीविकेसाठी पळशी गावातून १९७५ मध्ये नातेपुते (ता. माळशिरस) येथे गेले होते. १९७९ साली जयवंत महानवर यांचे निधन झाले. परंतु, त्यांच्या मुलांना गावाकडे जमीन असल्याची माहिती होती. गावच्या यात्रेनिमित्त आल्यावर त्यांना त्यांच्या साडेपाच जमिनीची विक्री झाल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने त्यांनी कागदपत्रे काढून तत्कालिन मंडलाधिकाऱ्यांकडे फेरफार नोंदीस आक्षेप घेतला. तरीदेखील नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यावर त्यांनी अपिल केले. अपिलामध्ये मंडलाधिकाऱ्यांनी केलेल्या नोंदीला स्थगिती दिली. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप आरोपींना अटक केली नाही. (प्रतिनिधी)४या प्रकरणात तत्कालिन दुय्यम निबंधक, तलाठी, मंडलाधिकारी यांनीदेखील आरोपींना मदत केली. त्यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबादास पवार या सराईत आरोपी व त्याच्या टोळीचा तपास आपल्याकडे आहे. त्या टोळीला अटक केल्यापासून विविध ठिकाणचे गुन्हे उघड होत आहे. त्यामुळे या जमीन फसवणूक प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक केली नाही- जी. टी. संकपाळ , पोलीस उपनिरीक्षक