शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

जात प्रमाणपत्रासाठी विमुक्तांची भटकंती

By admin | Updated: May 8, 2014 02:08 IST

भटक्या समाजातील विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वंशावळीची नोंदच नसल्याने प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे.

वंशावळीची नोंदच नाही : शिक्षणासाठी केविलवाणी धडपडतळेगाव(श्यामजीपंत) : / भटक्या समाजातील विद्यार्थ्यांवर जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या वंशावळीची नोंदच नसल्याने प्रमाणपत्र मिळणे अवघड झाले आहे.शासनाने भटक्या विमुक्त जमातीचे प्रमाणपत्र देताना ६0 वर्र्षांचा कागदोपत्री पुरावा मागितला आहे. गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही. अशी या समाजाची आजवरची अवस्था आहे. मग कुटुंबाची नोंद कोठे व कशी असणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या समाजातील मुले शिक्षणासाठी पुढे येत आहेत. मात्र त्यासाठी या समाजातील विद्यार्थ्यांना वंशावळीचे पुरावे आणण्याची अट घातली आहे. मागासवर्गीय तसेच भटक्या विमुक्त समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळण्यासाठी या समाजातील व्यक्तींना प्रथम जातीच्या दाखल्याची व जात प्रमाणपत्राच्या अडथळ्याची अट पूर्ण करावी लागत आहे. ही अट पूर्ण करताना केवळ या विद्यार्थ्यांची नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची दमछाक होत आहे. जातीचा दाखल व जात पडताळणीचे प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. केवळ जातीचे प्रमाणपत्र मिळाले नसल्याने गुणवत्ता असूनही शासकीय नोकरीला मुकण्याची वेळ या समाजातील अनेक विद्यार्थ्र्यांवर आली आहे. पुरावे नसणे किंवा अपुरी कागदपत्रे यामुळे जात पडताळणीची असंख्य प्रकरणे प्रलंबित आहेत. सुनावणीच्या वेळी या पुराव्याची दाखल्यासह माहिती द्यावी लागते. अन्यथा या मुलांना आयुष्यभर भटकंती करावी लागत आहे. मागासलेपणाचा कपाळावर शिक्का घेवून आयुष्यभर पोटाची खळगी भरण्यासाठी भटकत राहिलेला हा समाज आता शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागला हे विशेष.(वार्ताहर)