शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणीकाठ बनला धोकादायक

By admin | Updated: July 8, 2017 01:57 IST

इंद्रायणीकाठ बनला धोकादायकपावसामुळे इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा स्थितीतही या ठिकाणी

भानुदास पऱ्हाड/ लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : पावसामुळे इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा स्थितीतही या ठिकाणी येणारे भाविक, तसेच विद्यार्थी जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरत आहेत. घाटावर सुरक्षारक्षक नसल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. आळंदी देवाची येथे चार दिवसांपूर्वी एका तेरावर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळी हंगामात या प्रकारच्या अपघातांची संख्या वाढत आहे. येथील स्थानिक विद्यार्थी नदी किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज न घेता सेल्फी काढतात. पुलावर बसून नदीपात्रात पाय सोडून विद्यार्थी बसत असत आहेत. या गोष्टी त्यांच्या जिवावर बेतत आहेत. इंद्रायणी नदीच्या काठी रोज हजारो भाविक तसेच पर्यटक येत असतात. अंघोळ करण्यासाठी भाविक नदीत उतरत असतात. नगरपरिषदेने सुरक्षात्मक उपायोजना करणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष झाले आहे. भाविकांच्या तसेच स्थानिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजनांची मागणी होत आहे. नदीपात्रात पाणी वाढलेनगरपालिकेने नागकिरांच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून घाटावर किमान दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने इंद्रायणी नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत असून, पाण्याचा प्रवाह जोरदार आहे. मात्र घाटावर बेजबाबदारपणे अनेक जण आपला जीव धोक्यात घालत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता आहे.