शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

इंद्रायणीकाठ बनला धोकादायक

By admin | Updated: July 8, 2017 01:57 IST

इंद्रायणीकाठ बनला धोकादायकपावसामुळे इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा स्थितीतही या ठिकाणी

भानुदास पऱ्हाड/ लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : पावसामुळे इंद्रायणी नदीपात्राच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. अशा स्थितीतही या ठिकाणी येणारे भाविक, तसेच विद्यार्थी जिवाची पर्वा न करता नदीपात्रात उतरत आहेत. घाटावर सुरक्षारक्षक नसल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा ऐरणीवर आली असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. आळंदी देवाची येथे चार दिवसांपूर्वी एका तेरावर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळी हंगामात या प्रकारच्या अपघातांची संख्या वाढत आहे. येथील स्थानिक विद्यार्थी नदी किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज न घेता सेल्फी काढतात. पुलावर बसून नदीपात्रात पाय सोडून विद्यार्थी बसत असत आहेत. या गोष्टी त्यांच्या जिवावर बेतत आहेत. इंद्रायणी नदीच्या काठी रोज हजारो भाविक तसेच पर्यटक येत असतात. अंघोळ करण्यासाठी भाविक नदीत उतरत असतात. नगरपरिषदेने सुरक्षात्मक उपायोजना करणे गरजेचे असतानाही याकडे दुर्लक्ष झाले आहे. भाविकांच्या तसेच स्थानिकांच्या सुरक्षेसाठी उपययोजनांची मागणी होत आहे. नदीपात्रात पाणी वाढलेनगरपालिकेने नागकिरांच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून घाटावर किमान दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने इंद्रायणी नदी पाण्याने तुडुंब भरून वाहत असून, पाण्याचा प्रवाह जोरदार आहे. मात्र घाटावर बेजबाबदारपणे अनेक जण आपला जीव धोक्यात घालत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता आहे.