शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

खराब हवामानामुळे पानवेलींना रोगांचा धोका

By admin | Updated: January 1, 2015 23:37 IST

इंदापूर तालुक्यामध्ये काल रात्रीपासून हवामानामध्ये अचानक बदल झाला आहे.

निमगाव केतकी : इंदापूर तालुक्यामध्ये काल रात्रीपासून हवामानामध्ये अचानक बदल झाला आहे. खराब हवामान व धुक्यामुळे येथील पिकांवर वेगवेगळे रोग येण्याची भीती शेतकऱ्यांंकडून व्यक्त करण्यात येत आहे. या हवामानाचा मोठा परिणाम पानमळ्यांवर होईल, असे शेतकऱ्यांडून सांगितले जात आहे. सद्य स्थितीमध्ये पानमळ्यामध्ये असलेल्या फाफडा जातीच्या पानांवरती धुक्यामुळे करपा रोग येण्याची भीतीही पानउत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. निमगाव केतकी परिसरासह पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये विविध प्रकारची पिके आहेत. यामध्ये डाळिंब, मका, ऊस, टोमॅटो तसेच वेगवेगळ्या पालेभाज्यावर्गीय पिकांचा समवेश आहे. याबरोबरच निमगाव परिसरामध्ये पानमळ्यांचे प्रमाण जास्त आहे. या सर्व पिकांवरती हवामानामध्ये झालेल्या अचानक बदलाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे अनेक रोग या पिकावर आल्यामुळे उत्पादनात मोठी घट होऊन उत्पन्नावर परिणाम होणार आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात निमगाव केतकी परिसरासह इंदापूर तालुक्यामध्ये अचानक गारपीट झाली होती. या गारपिटीमध्ये या भागातील डाळिंब पानमळे, टोमॅटो या पिकांसह सर्व प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पानउत्पादक शेतकरी प्रत्येक वर्षी जास्तीतजास्त उत्पन्न मिळावे यासाठी शेतकरी वर्षभर फाफडा जातीची पाने पानवेलीच्या अंगावर जोपासतात. या पानांची निगा राखण्यासाठी पानवेलींना वेळच्या वेळी पाणी देणे, खते टाकणे, औषध फवारणे, माती टाकणे पानवेलींच्या अंगावरील इतर जातीचे पाने वेळच्या वेळी खुडणे अशी काळजी घेत असतात. कारण वर्षभर संभाळलेली ही पाने पानउत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून देतात . मागील वर्षीही पाने खुडण्याच्या कालावधी येण्यापूर्वीच अवकळी गारपीट झाली आणि फाफडा जातीची पाने गारांच्या फटक्याने फाटून गेली. त्यामुळे या वेलीची उत्पादन क्षमता मंदावली. याचा परिणाम चालू वर्षी पानउत्पादक शेतकऱ्यांना प्रकर्षाने जाणवत आहे.या वर्षामध्ये निमगाव केतकीला इंदापूर तालुक्यातील अनेक पानमळ्यांची अवस्था बिकट झाली आहे. (वार्ताहर)नवीन वर्षाची सुरुवात धुक्यात...नवीन वर्षाची सुरुवात होत असताना पहिल्याच दिवशी खराब हवामान पडल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसत आहे. कारण, गेल्या वर्षभर अनेक संकटे आल्याने शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. २०१५ची सुरुवात खराब वातावरणात झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. गतवर्षी नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते.४काही पानवेली बसवल्यानंतर हव्या त्या प्रमाणामध्ये फुटल्या नाहीत त्यामुळे पानांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. पर्यायानेच याचा उत्पन्नावर परिणाम होताना दिसत आहे. सद्य स्थितीमध्ये खराब हवामानामुळे फाफडा पानांवरती जाळी तयार होणे, पाने लागट होणे, पानांच्या पाठीमागील बाजूस पांढरा मावा येणे, काळे डाग पडणे असे रोग पानवेलीवरती येणार असून, याचा उत्पन्नावर परिणाम होईल, असे सध्याचे चित्र आहे.