शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

धोकादायक पाळणा बेतू लागला जीवावर

By admin | Updated: February 4, 2017 03:54 IST

नगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावातील नदीवरील धोकादायक पाळणा आता जीवावर बेतू लागल्याचे दिसू लागले आहे. वारंवार पाठपुरावा

ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावातील नदीवरील धोकादायक पाळणा आता जीवावर बेतू लागल्याचे दिसू लागले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही साकव पूल मात्र होत नसल्याने अनास्था उघड होत आहे. गेल्या आठवड्यातच दि. २९ जानेवारी २०१७ रोजी या पाळण्यात बसून जाणाऱ्या मंगल बाबाजी लोहोट (वय ४५) ही महिला पाण्यात पडून, पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी आहे. त्यापार्श्वभूमीवर हा धोकादायक प्रवास पुन्हा अधोरेखीत झाला आहे. गावाजवळूनच पुष्पावती नदी वाहते. या नदीतून पलिकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून शेरकर मळा, तांबे मळा व लोहोटे वस्तीवरील ३० ते ३५ कुटुंबे लोखंडी पाळण्यातून सातत्याने गावात ये-जा करतात. हा पाळणा धोकादायक आहे. या गावातील स्थानिक पुढाऱ्यांनी जुन्नरचे तहसीलदार पं. समिती, जिल्हा परिषद व खासदारांकडे सातत्याने मागणी करूनही येथे साकव पूल होत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ डिंगारे गावठाणात जाण्यासाठी, शेतात जाण्यासाठी या लोखंडी धोकादायक पाळण्याचा उपयोग करतात. मधला जवळचा मार्ग म्हणून ग्रामस्थ या पाळण्याचा उपयोग करतात. दररोज सुमारे २५० ग्रामस्थ व विद्यार्थी या पाळण्याचा उपयोग करतात. (वार्ताहर)जीवघेणा प्रवास थांबवा एकदाचासाकव पुलाची मागणी अनेक वेळा केली; परंतु या वस्तीवरील, शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाने पुसली जात आहे. शासनाने या मागणीची त्वरित दखल घ्यावी म्हणजे, अशा दुर्दैवी घटना घडणार नाहीत. पुलाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत नदी ओलांडण्यासाठी या पाळण्याचा वापर होत राहणारच कारण मधला जवळचा मार्ग पुष्पावती नदीला बाराही महिने पाणी असते. तरीही ग्रामस्थ या धोकादायक पाळण्यातूनच जातात.