शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

गावे गडप होण्याचा धोका

By admin | Updated: November 24, 2014 00:30 IST

मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे

विलास भेगडे, तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी असलेली अनेक गावे व वसाहती गडप करू शकतात. या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. मावळ तालुक्यात जमिनीला सोन्याचा भाव असल्याने मागील काही वर्षांमध्ये अतिक्रमण व बेकायदा खोदकामाच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले असल्याने पुणे - मुंबईच्या धनिकांचा मावळकडे ओढा आहे. सध्या मावळ तालुक्यात एजंट/दलालांचा सुळसुळाट आहे. जमीन खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक होणारच नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. यामुळे अशा गावांचे सर्वेक्षण करून शासन पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. १९८९ मध्ये म्हणजेच २५ वर्षांपूर्वी मावळातील भाजे गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३७ माणसांना जीव गमवावा लागला होता, तर देवघर येथे अशाच घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले होते. नायगाव येथील डोंगरावरील दरड बुधवारी (दि. १९) कोसळून बांधकामावर काम करणाऱ्या विघ्नेश मेश्राम (वय २९) या कामगारास आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे डोंगर पोखरण्याचे प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मावळात दर वर्षी धो-धो पाऊस कोसळतो. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळा-खंडाळा या भागासह पवन मावळ, आंदर मावळ, नाणेमावळातील डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात. बंगलेवाल्यांनी डोंगरावर बनविले रस्तेपाले व करंजगावच्या डोंगरावर खासगी बंगले उभारण्यात आल्याने तेथेही रस्ते बनले आहेत. कादव, शिळीम, वाघेश्वर, तुंग, चावसर, येथे तसेच तिकोणा, लोहगड या किल्ल्यांखाली मोठमोठी हॉटेल, रिसॉर्ट व खासगी फार्महाऊस उभारले आहेत. त्यामुळे या भागात अधूनमधून मातीचे ढिगारे कोसळतात. डोंगराच्या कडांना भेगा पडतात. अर्धवट तुटलेले कडे व सुळके या गावांना धोकादायक आहेत. या गावात बहुसंख्य लोक आदिवासी व धनगर जमातीचे आहेत. काहींनी पूर्वीपासून थेट डोंगरावरच घरे उभारली आहेत.डोंगर ढासळला अथवा कडा कोसळल्यास डोंगरावर राहणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. ग्रामीण भागातील मावळची लाल माती बागकामासाठी प्रसिद्ध आहे. तिचाही बेसुमार उपसा सुरू असल्याचे दिसून येते. डोंगरकडेची माती उपसल्याने पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच जमीनदोस्त होण्यासारखी परिस्थिती मावळात अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मावळ तालुक्यातील बेकायदा खोदकाम व अनधिकृत बांधकामावर महसूल खात्याची करडी नजर आहे. दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येते. कायद्याचे पालन करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता खनिज संपत्तीचे जतन केले जाईल. यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील अनधिकृत बांधकाम व खोदकामास जलद आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागृत राहून महसूल खात्याला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी लोकमतशी बोलताना केले.