शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गावे गडप होण्याचा धोका

By admin | Updated: November 24, 2014 00:30 IST

मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे

विलास भेगडे, तळेगाव दाभाडे मावळ तालुक्यात काही वर्षांपासून धनिकांनी डोंगरच विकतच घेतले होते. ते पोखरून मोठ-मोठे प्रकल्प उभारण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे प्रकल्प डोंगराच्या पायथ्याशी असलेली अनेक गावे व वसाहती गडप करू शकतात. या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. मावळ तालुक्यात जमिनीला सोन्याचा भाव असल्याने मागील काही वर्षांमध्ये अतिक्रमण व बेकायदा खोदकामाच्या संख्येत वाढ झाली आहे. तालुक्याला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले असल्याने पुणे - मुंबईच्या धनिकांचा मावळकडे ओढा आहे. सध्या मावळ तालुक्यात एजंट/दलालांचा सुळसुळाट आहे. जमीन खरेदी-विक्री प्रकरणात फसवणूक होणारच नाही, याची शाश्वती राहिलेली नाही. यामुळे अशा गावांचे सर्वेक्षण करून शासन पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. १९८९ मध्ये म्हणजेच २५ वर्षांपूर्वी मावळातील भाजे गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३७ माणसांना जीव गमवावा लागला होता, तर देवघर येथे अशाच घटनेत दोन जण मृत्युमुखी पडले होते. नायगाव येथील डोंगरावरील दरड बुधवारी (दि. १९) कोसळून बांधकामावर काम करणाऱ्या विघ्नेश मेश्राम (वय २९) या कामगारास आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे डोंगर पोखरण्याचे प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मावळात दर वर्षी धो-धो पाऊस कोसळतो. वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हजारोच्या संख्येने पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळा-खंडाळा या भागासह पवन मावळ, आंदर मावळ, नाणेमावळातील डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटतात. बंगलेवाल्यांनी डोंगरावर बनविले रस्तेपाले व करंजगावच्या डोंगरावर खासगी बंगले उभारण्यात आल्याने तेथेही रस्ते बनले आहेत. कादव, शिळीम, वाघेश्वर, तुंग, चावसर, येथे तसेच तिकोणा, लोहगड या किल्ल्यांखाली मोठमोठी हॉटेल, रिसॉर्ट व खासगी फार्महाऊस उभारले आहेत. त्यामुळे या भागात अधूनमधून मातीचे ढिगारे कोसळतात. डोंगराच्या कडांना भेगा पडतात. अर्धवट तुटलेले कडे व सुळके या गावांना धोकादायक आहेत. या गावात बहुसंख्य लोक आदिवासी व धनगर जमातीचे आहेत. काहींनी पूर्वीपासून थेट डोंगरावरच घरे उभारली आहेत.डोंगर ढासळला अथवा कडा कोसळल्यास डोंगरावर राहणाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. ग्रामीण भागातील मावळची लाल माती बागकामासाठी प्रसिद्ध आहे. तिचाही बेसुमार उपसा सुरू असल्याचे दिसून येते. डोंगरकडेची माती उपसल्याने पावसाळ्यात संपूर्ण डोंगरच जमीनदोस्त होण्यासारखी परिस्थिती मावळात अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मावळ तालुक्यातील बेकायदा खोदकाम व अनधिकृत बांधकामावर महसूल खात्याची करडी नजर आहे. दोषींवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येते. कायद्याचे पालन करताना कोणाचाही मुलाहिजा न ठेवता खनिज संपत्तीचे जतन केले जाईल. यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुक्यातील अनधिकृत बांधकाम व खोदकामास जलद आळा घालण्यासाठी नागरिकांनी जागृत राहून महसूल खात्याला सहकार्य करावे,असे आवाहन तहसीलदार शरद पाटील यांनी लोकमतशी बोलताना केले.