शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

नदीकाठावर पुराचा धोका २० हजार क्युसेक्सलाच

By admin | Updated: June 10, 2015 05:37 IST

खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते.

पुणे : खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. नदीपात्रात झालेली अतिक्रमणे आणि पडलेला राडारोडा यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली असल्याची अप्रत्यक्ष कबुली महापालिकेतर्फेच देण्यात आली. पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पावसाळा तोंडावर येऊनही सुरू झाला नव्हता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त दिल्यावर, जागे झालेल्या प्रशासनाने मंगळवारी हा कक्ष सुरू केला. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘मुठा नदीत वीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्या नंतर नदीकाठच्या परिसरात तत्काळ अतिदक्षतेचा इशारा जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी चाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर, हा इशारा दिला जात होता. नदीकाठच्या परिसरात पाणी घुसून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये महापालिकेचा पूरनियंत्रण कक्ष २४ तास सुरू असणार आहे. १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे. एसएमएसद्वारे मिळणार अलर्ट धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर, ज्या परिसरात पाणी घुसण्याची शक्यता आहे- त्या परिसरातील नागरिकांना तत्काळ ही माहिती मिळावी, यासाठी बल्क एसएमएसद्वारे अलर्ट देण्यात येणार आहे. हा अलर्ट संबंधित भागातील सोसायट्यांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी, तसेच त्या परिसरातील काही संस्थांनाही पाठविले जाणार आहेत. या शिवाय त्या परिसरातील संस्था, तसेच मंडळांनाही याबाबतचे अर्लट पाठविले जाणार आहेत.शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अथवा नागरिकांना काही तक्रारी असल्यास, त्यांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. पूरनियंत्रण कक्षाचा २५५०६८००/१/२/३/४ हा क्रमांक चोवीस तास उपलब्ध असणार आहे. या शिवाय क्षेत्रीय कार्यालयांसाठीचे क्रमांकही लवकरच जाहीर केले जाणार असून, नागरिक १०१ या अग्निशमदलाच्या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.