शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
3
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉचिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
4
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
5
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
7
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
8
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
9
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
10
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
11
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
12
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
13
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
14
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
15
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
16
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
17
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
19
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
20
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा

खंडोबा देवस्थानात समन्वयातून दानपेटी

By admin | Updated: March 28, 2015 23:46 IST

श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील उत्पन्नाबाबत सहधर्मादाया आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची आजपासून (दि.२८) अंमलबजावणी सुरु झाली.

जेजुरी : श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबा मंदिरातील उत्पन्नाबाबत सहधर्मादाया आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची आजपासून (दि.२८) अंमलबजावणी सुरु झाली. मार्तंड देवसंस्थान व पुजारी यांच्या समन्वयातुन शनिवारी तहसिलदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत देवासमोर दक्षिणापेटी बसवण्यात आली. पाटील यांनी पेटीची पुजा करुण पाचशे रुपयाची नोट पेटीत टाकुन योजनेचा प्रारंभ केला. ही सीलबंद पेटी दर आठवड्याला तहसिलदार व पंचासमक्ष उघडली जाणार आहे. त्यातील उत्पन्न देवस्थान व पुजारीवर्गामध्ये प्रत्येकी पन्नास टक्याप्रमाणे वाटले जाणार आहे. पुजा अभिषेक पासासाठी पंचवीस रुपये द्यावे लागणार आहेत. देवस्थानमधील उत्पन्नाबाबत गेली अनेक वर्ष वाद होत होते. हे वाद विसरुन देवस्थानच्या विकासासाठी व भाविकांच्या सेवेसाठी एकत्रीतपणे काम करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, वसंत नाझीरकर, किशोर म्हस्के, उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई, सुनिल असवलीकर, नितीन बारभाई, सुधाकर मोरे, किरण मोरे, सुरेश लांघी, शामराव लांघी, बाळकृष्ण दिडभाई, प्रशांत सातभाई आदी यावेळी उपस्थित होते.यानंतर देवस्थानच्या कार्यालयात झालेल्या आभारप्रदर्शन कार्यक्रमात तहसिलदार पाटील म्हणाले, आजपर्यंतच्या सर्व विश्वस्त मंडळ व पुजारीवर्गात सुसंवाद नसल्याने गैरसमज होत होते. मात्र आता सर्वांच्या सहकार्यांने या निणर्याची अंमलबजावणी होत आहे. जेजुरीच्या इतिहासातील हा सुवर्णअक्षराने लिहावा असा क्षण आहे. पुजा-यांच्या कोणत्याही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी देवसंस्थान सदैव तत्पर राहिल. यापुढे जेजुरीचे महत्व वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत असे विचार माजी विश्वस्त राजेंद्र बारभाई यांनी व्यक्त केले. यावेळी विश्वस्त संदीप घोणे, सहाय्यक पोलिस निरिक्षक रामदास शेळके यांचीही भाषणे झाली. ४मंदिरावर सोन्याचा कळस व चांदीचा गाभारा करण्यासाठी देवसंस्थानने प्रयत्न सुरु असल्याची माहिती मुख्य विश्वस्त डॉ.खंडागळे यांनी दिली. प्रशासनाला आम्ही कायमच मदत करीत आलो आहोत. गावातील काही राजकारणी मंडळींनी पुजारी व देवसंस्थानला एकत्र येऊ दिले नाही. त्यामुळे वाद होत राहिले.