शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दांडेकर पुलावरील खूनाचे गूढ उकलले

By admin | Updated: April 22, 2015 05:40 IST

हरवलेल्या चुलत्याचा पत्ता सांगत नाही, म्हणून एकाला दारू पाजून गळ्यावर आणि पोटात वार करून त्याचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला होता

पुणे : हरवलेल्या चुलत्याचा पत्ता सांगत नाही, म्हणून एकाला दारू पाजून गळ्यावर आणि पोटात वार करून त्याचा मृतदेह कालव्यात टाकून देण्यात आला होता. गेल्या आठवड्यात दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना स्वारगेट पोलिसांनी उघडकीस आणली. खुनाचे गूढ उकलत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.सूरज नंदू उत्तेकर (वय २१, रा. १३०, दांडेकर पुल), किरण बापू मिसाळ (वय १३३, आंबिल ओढ़ा कॉलनी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांनी संभाजी दादाराम ओहाळ (वय ४२, रा. लातूर) यांचा खून केला होता. आरोपींना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. वरिष्ठ निरीक्षक निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहाळ हे मुळचे लातूरचे होते. त्यांची बहिण सिंहगड रस्त्यावर राहण्यास आहे तर भाऊ दांडेकर पुलावर राहतो. ओहाळ सध्या या दोघांकडे येऊन जाऊन राहत होते. आरोपी सूरज याचा चुलता हरवलेला आहे. त्याचा पत्ता ओहाळ यांना माहिती होता असे त्यांनी आरोपींना सांगितले होते. परंतु, ते पत्ता सांगत नव्हते. त्यामुळे आरोपींनी त्यांना १० एप्रिल रोजी रात्री दारू प्यायला सोबत नेले. दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कालव्याशेजारी दारूपित बसलेले होते. त्यावेळी सूरज याने पुन्हा चुलत्याचा पत्ता विचारला. परंतु ओहाळ यांनी पत्ता सांगण्यास नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या आरोपींनी ओहाळ यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यानंतर बियरची बाटली फोडून काचेने पोटात भोसकले. खून केल्यानंतर त्याचे कपडे काढून मृतदेह कालव्यात फेकून दिला होता.