शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दौंडकरांना मिळणार हक्काचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:12 IST

अनेक वर्षांपासून दौंडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू होता.

खोर : अनेक वर्षांपासून दौंडच्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू होता. मात्र, हा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच दौंड तालुक्यातील दुष्काळी भागाला या आपल्या हक्काच्या पाण्याचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.खोर, देऊळगावगाडा, पडवी, कुसेगाव, माळवाडी ही गावे दर वर्षीच उन्हाळा तोंडावर आला, की पाणीटंचाईने भरडली जातात.दुष्काळ सहन करणे व पाण्याच्या संघर्षाला तोंड देणे ही कायमस्वरूपी परंपरा या भागातील शेतकरीवर्गाची होत होती. मात्र, आता ही टंचाईची परिस्थिती लवकरच आटोक्यात येणार असून, कार्यान्वित असलेल्या जनाई-शिरसाई व पुरंदर योजनेतून या दुष्काळी भागाला पाणी मिळणार आहे.मुंबई येथे सिंचन भवनात दौंडच्या पाणीप्रश्नावर बैठक घेण्यात आली. या वेळी खोरचे सरपंच सुभाष चौधरी, देऊळगावगाडाचे माजी सरपंच डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, विजय कुदळे, राहुल चौधरी, भानुदास डोंबे तसेच पाणी योजनेचे अधीक्षक अभियंता व अधिकारी वर्ग उपस्थित होता. या वेळी दौंड तालुक्यातील खोर, देऊळगावगाडा या गावांना पाणी सोडण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.कार्यान्वित पुरंदर जलसिंचन उपसा योजनेच्या कार्यक्षेत्रात डोंबेवाडी पाझर तलाव हा येत नसल्याने पाणी सोडण्यात मोठी अडचण येत होती. पुरंदर जलसिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात डोंबेवाडी पाझर तलाव हा घेण्यात यावा व बंदिस्त पाईपलाईनची योजना होऊन खोर व देऊळगावगाडा या गावांना पाणी मिळावे म्हणून बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असून त्याचा प्रशासन विभागाकडे प्रस्तावदेखील सादर केला आहे. लवकरच या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळणार आहे.>दोन दिवसांपूर्वी आमदार राहुल कुल यांनी खोरला पाणीप्रश्नासंदर्भात दौरा केला होता. या वेळी जनाई-शिरसाई योजनेच्या माध्यमातून खोरच्या पद्मावती व फडतरेवस्ती तलावात शेतकºयांना लोकवर्गणी भरूनदेखील पाणी सुटण्याची वाट पाहावी लागली होती. या वेळी राहुल कुल यांनी जनाई योजनेच्या अधिकारीवर्गाला चांगलेच धारेवर धरले आहे. ‘जनाई-शिरसाई योजनेला जे पाणी जाते, ते दौंडचे आहे. आमचेच पाणी आमच्याच लोकांना पैसे भरूनदेखील मिळणार नसेल, तर जनाई-शिरसाई योजनेला जाणारे पाणी दौंडमधून बंद करू,’ असा इशारा राहुल कुल यांनी सिंचन योजनेच्या अधिकाºयांना दिला. त्यानुसार जनाई-शिरसाई योजनेतून खोरच्या पद्मावती तलावात पाणी सोडण्यात आले असून फडतरेवस्ती तलावातदेखील आता पाणी लवकरच पोहोचणार आहे. दौंडच्या जनतेचे हक्काचे पाणी असूनदेखील वारंवार हक्क डावलला जात असेल, तर दौंडची जनता ही गप्प बसणार नाही, असे खडे बोल आमदार कुल यांनी सुनावले आहेत.