शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

काळदरीमधील वणव्यात फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:10 IST

काळदरी परिसरात लागलेल्या वणव्यात शेतीचे व वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. वणवा लावणाऱ्या लोकांवर सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा ...

काळदरी परिसरात लागलेल्या वणव्यात शेतीचे व वन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. वणवा लावणाऱ्या लोकांवर सासवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जोपर्यंत या दोषींवर कठोर कारवाई करुन नुकसानभरपाई वसूल करण्याची मागणी सरपंच गणेश जगताप यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता काळदरी परिसरामध्ये कोठेही नवीन वनक्षेत्र तयार झाले नाही याचा विचार केला असता वन विभागाचा नाकर्तेपणा समोर आला असून, परिसरात कोठेही जाळशेषा काढल्या नाहीत. वन क्षेत्रालगत असलेल्या शेत जमिनींचे वणव्यात नुकसान होऊ नये म्हणून कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नसल्याचे जगताप यांनी सांगितले.

काळदरी मध्ये लागलेल्या वणव्यात फळबागा, उभी पिके, साठवलेला चारा भस्मसात झाला असून हातातोंडाशी आलेल्या फळबागा व ठिबक संच जळाल्याने शेतकऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बहिरवाडी, परिसरातील वन क्षेत्राला वणव्याच्या झळा मोठ्या प्रमाणावर बसल्या आहेत.'एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष' या योजनेचा गाजा वाजा करून वन विभागाने झाडे लावली असली तरी या झाडांचे संगोपन व रक्षण करण्यात वन विभागाला अपयश आले असल्याचेेेे बहिरवाडीचे सरपंच दशरथ जानकर म्हणाले आहेत.

वन वाचवण्यासाठी वेळोवेळी गावपातळीवर जागृती करुनसुध्दा शेतकरी बांध पेटवतात तेथून खरी वणव्याला सुरवात होते. वणवा लावणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करणार असून, या आरोपींविरुद्ध तक्रार देण्यासाठी गावकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन पुरंदरच्या वन परिक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप यांनी केले आहे.

काळदरी (ता. पुरंदर) येथे वणव्यात फळबागा व ठिबक सिंचन संच जळून खाक झाले आहेत.