शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके ...

वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे. तर डाळिंब, सीताफळ, चिक्कू, अंजीरच्या फळबागांतील झाडे उन्मळून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

दरवर्षीच काही ना काही आसमानी संकटे येऊन, शेतकरीवर्गाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने फळबागांसह, पालेभाज्या, जनावरांचा हिरवा चारा जमीनदोस्त झाला. पावसाने डाळिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळ व लहान मोठ्या फळांनी बहरलेली झाडे जमीनदोस्त झाली आहेत. पहिल्यांदाच या भागात काही ठिकाणी आंबा पिकवला जात होता. मात्र तीन दिवसांत दोन वेळेस वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने या फळबागांना जोरदार झोडपून काढल्याने फळे तुटून पडल्याने नुकसान झाले आहे. आडाचीवाडी परिसरात प्रामुख्याने अंजीर पिकाचे उत्पादक आहेत. अंजीराचा हंगाम मागील वर्षांपासून लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडत आहे. त्यामुळे अंजीराला उत्पादनाच्या मानाने, समाधानकारक किंमत येत नसल्याने, आगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच झालेल्या अवकाळी पाऊसाने, अनेक ठिकाणी अंजीराच्या झाडांच्या फांद्या दुफळी होऊन, तुटल्या आहेत . तसेच अंजीर पावसामुळे सडून जात आहेत.

सीताफळांचा बार अनेक झाडांना नुकताच निघाला होता. तर काही ठिकाणी झाडांना कळ्या व फळे लागली आहेत. मात्र अवकाळी पाऊस व जोरदार वा-यांने फळे तुटून पडली असून, जी फळे झाडांना शिल्लक राहिली आहेत, ती फळे फांद्याना व एकमेकांवर घासून त्यांना काळे ढाग पडल्याने, ती फळे मोठी झाल्यावर कवडीमोल भावात विकली जाण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून थोडीतरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी पवार, मधुकर पवार, अस्लम पठाण, सुनील भोसले, धनंजय पवार, ज्ञानेश्वर भुजबळ, सतीश भुजबळ आदी शेतक-यांनी केली आहे.

२७ वाल्हे

मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी रात्रं-दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली.

===Photopath===

270521\27pun_11_27052021_6.jpg

===Caption===

२७ वाल्हे मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी राञ -दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमिनदोस्त झालीत.