शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके ...

वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे. तर डाळिंब, सीताफळ, चिक्कू, अंजीरच्या फळबागांतील झाडे उन्मळून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

दरवर्षीच काही ना काही आसमानी संकटे येऊन, शेतकरीवर्गाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने फळबागांसह, पालेभाज्या, जनावरांचा हिरवा चारा जमीनदोस्त झाला. पावसाने डाळिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळ व लहान मोठ्या फळांनी बहरलेली झाडे जमीनदोस्त झाली आहेत. पहिल्यांदाच या भागात काही ठिकाणी आंबा पिकवला जात होता. मात्र तीन दिवसांत दोन वेळेस वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने या फळबागांना जोरदार झोडपून काढल्याने फळे तुटून पडल्याने नुकसान झाले आहे. आडाचीवाडी परिसरात प्रामुख्याने अंजीर पिकाचे उत्पादक आहेत. अंजीराचा हंगाम मागील वर्षांपासून लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडत आहे. त्यामुळे अंजीराला उत्पादनाच्या मानाने, समाधानकारक किंमत येत नसल्याने, आगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच झालेल्या अवकाळी पाऊसाने, अनेक ठिकाणी अंजीराच्या झाडांच्या फांद्या दुफळी होऊन, तुटल्या आहेत . तसेच अंजीर पावसामुळे सडून जात आहेत.

सीताफळांचा बार अनेक झाडांना नुकताच निघाला होता. तर काही ठिकाणी झाडांना कळ्या व फळे लागली आहेत. मात्र अवकाळी पाऊस व जोरदार वा-यांने फळे तुटून पडली असून, जी फळे झाडांना शिल्लक राहिली आहेत, ती फळे फांद्याना व एकमेकांवर घासून त्यांना काळे ढाग पडल्याने, ती फळे मोठी झाल्यावर कवडीमोल भावात विकली जाण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून थोडीतरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी पवार, मधुकर पवार, अस्लम पठाण, सुनील भोसले, धनंजय पवार, ज्ञानेश्वर भुजबळ, सतीश भुजबळ आदी शेतक-यांनी केली आहे.

२७ वाल्हे

मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी रात्रं-दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली.

===Photopath===

270521\27pun_11_27052021_6.jpg

===Caption===

२७ वाल्हे मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी राञ -दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमिनदोस्त झालीत.