शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके ...

वाल्हे : कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना वादळी वाऱ्यासह पावासाचा जोरदार तडाखा पिकांना बसला आहे. अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहे. तर डाळिंब, सीताफळ, चिक्कू, अंजीरच्या फळबागांतील झाडे उन्मळून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

दरवर्षीच काही ना काही आसमानी संकटे येऊन, शेतकरीवर्गाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. त्यातच वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने फळबागांसह, पालेभाज्या, जनावरांचा हिरवा चारा जमीनदोस्त झाला. पावसाने डाळिंबाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात फुलगळ व लहान मोठ्या फळांनी बहरलेली झाडे जमीनदोस्त झाली आहेत. पहिल्यांदाच या भागात काही ठिकाणी आंबा पिकवला जात होता. मात्र तीन दिवसांत दोन वेळेस वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या मुसळधार पावसाने या फळबागांना जोरदार झोडपून काढल्याने फळे तुटून पडल्याने नुकसान झाले आहे. आडाचीवाडी परिसरात प्रामुख्याने अंजीर पिकाचे उत्पादक आहेत. अंजीराचा हंगाम मागील वर्षांपासून लॉकडाऊनच्या तडाख्यात सापडत आहे. त्यामुळे अंजीराला उत्पादनाच्या मानाने, समाधानकारक किंमत येत नसल्याने, आगोदरच शेतकरी चिंतेत होता. त्यातच झालेल्या अवकाळी पाऊसाने, अनेक ठिकाणी अंजीराच्या झाडांच्या फांद्या दुफळी होऊन, तुटल्या आहेत . तसेच अंजीर पावसामुळे सडून जात आहेत.

सीताफळांचा बार अनेक झाडांना नुकताच निघाला होता. तर काही ठिकाणी झाडांना कळ्या व फळे लागली आहेत. मात्र अवकाळी पाऊस व जोरदार वा-यांने फळे तुटून पडली असून, जी फळे झाडांना शिल्लक राहिली आहेत, ती फळे फांद्याना व एकमेकांवर घासून त्यांना काळे ढाग पडल्याने, ती फळे मोठी झाल्यावर कवडीमोल भावात विकली जाण्याची शक्यता आहे. एकूणच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शासनाकडून थोडीतरी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संभाजी पवार, मधुकर पवार, अस्लम पठाण, सुनील भोसले, धनंजय पवार, ज्ञानेश्वर भुजबळ, सतीश भुजबळ आदी शेतक-यांनी केली आहे.

२७ वाल्हे

मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी रात्रं-दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली.

===Photopath===

270521\27pun_11_27052021_6.jpg

===Caption===

२७ वाल्हे मुकदमवाडी येथील शेतकरी मधुकर बापूराव पवार यांनी राञ -दिवस कष्टाने पिकवलेल्या डाळिंबाच्या बागेतील फळे लागलेली झाडे उन्मळून जमिनदोस्त झालीत.