शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

देश समाजकारण्यांमुळे चालतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 04:49 IST

राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे

पुणे : राजकारण हे अळवावरचे पाणी असते, पान हलले की पाण्याचे थेंब पटापट पडतात, समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते, अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली.‘लायन्स क्लब पुणे औंध-पाषाण’चे नूतन अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि त्यांच्या कार्यकारिणीतील सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम शनिवारी पार पडला. या वेळी लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते. उपप्रांतपाल रमेश शाह, मावळते अध्यक्ष डॉ. प्रदीप दामले, सचिव गणेश जाधव, प्रदीप बर्गे, गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.गिरीश बापट म्हणाले, ‘‘माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसºयाला मदत करण्याची भावना, संस्कार निर्माण करणे हे लायन्सचे यश आहे. लायन्सचे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे. लायन्स क्लबने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे, पुढील काळात युवा नेतृत्व घडणाची जबाबदारी लायन्सने घ्यावी.’’लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण’ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ. सतीश देसाई यांनी या वेळी दिली. लायन्सच्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्ये केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप शेठ यांनी आभार मानले. विनोद शाह, कृष्णकांत कुदळे, अंकुश काकडे, अरुण शेवते, प्रकाश देवळे, मिलिंद जोशी, रवी चौधरी, सुरेश धर्मावत, सचिन इटकर आदी मान्यवर उपस्थित होते.