शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पर्यावरण जागृतीसाठी प्रणालीची महाराष्ट्रभर सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST

पुणे : पर्यावरणाची होणारी हानी, शेतात रासायनिक खतांच्या वापराने होणारी नासाडी, महिलांचे सक्षमीकरण, पाण्याची बचत, प्लास्टिकचा वापर टाळावा, याचा ...

पुणे : पर्यावरणाची होणारी हानी, शेतात रासायनिक खतांच्या वापराने होणारी नासाडी, महिलांचे सक्षमीकरण, पाण्याची बचत, प्लास्टिकचा वापर टाळावा, याचा संदेश देण्यासाठी एकवीस वर्षीय तरुणी सायकलवर महाराष्ट्रभर फिरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खेडेगावातील ही तरुणी २३ जिल्हे फिरून शनिवारी पुण्यात आली. तिचे पुणेकरांनी स्वागत केले. प्रणाली विठ्ठल चिकटे असे तिचे नाव आहे. कोणाचेही पाठबळ नसताना स्वत: तिने ही सायकल यात्रा सुरू केली आहे.

सभोवतालचे वाढते प्रदूषण, तापमानवाढ, वातावरण बदल, ऋतुचक्रबदल यांतून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाऊन लोकांशी संवाद साधत आहे. पुण्यात वाचन प्रक्रिया कट्ट्याच्या मुग्धा नलावडे, टेल्स ऑर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी तिचे स्वागत केले. चार-पाच दिवस ती पुण्यातील अनेक संस्थांशी संवाद साधणार आहे.

प्रणाली म्हणाली,‘‘मी शेतकरी कुटुंबातील आहे. आतापर्यंत दहा हजार किलोमीटरचा प्रवास झाला. खूप अनुभव आले. माझ्यामुळे कोविडचे संक्रमण होऊ नये याची दक्षता घेऊनच माझा प्रवास सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट (ता. वणी) गावी मी राहते. माझे बीएसडब्ल्यू झाले आहे. मी माझ्या गावातील शासकीय योजना लोकांना समजाव्यात यासाठी काम करत होते. लॉकडाऊनमध्ये पर्यावरणातील बदल वाचनात आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन पर्यावरणाबाबत जागृती करण्याचा विचार मनात आला आणि लगेच सुरवात केली. शेतात सेंद्रिय पद्धतीचा वापर होेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सुद्धा ही यात्रा संपल्यावर शेतीच करणार आहे.’’

पुण्यातून नगर, मुंबई आणि मराठवाड्याकडे ती मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये घरी पोहचण्याची तिची योजना आहे.

-------------------------------------

प्रणालीचे पाच संदेश

* वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोटारगाडी टाळून, शक्य ती कामे सायकलने करू या.

2. प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू. घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवा.

3. परिसरात झाडे लावू या व जगवू या. अनावश्यक वस्तूंच्या गरजा टाळून, अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या.

4. आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू आणि आपले आरोग्य सुधारू.

5. पाणी बचत व पाणी जिरवा या कामात सहभाग घेऊ या.