शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

चार गावांच्या पाण्यात कपात

By admin | Updated: March 3, 2016 01:35 IST

जिरायती भागाबरोबरच बागायती भागातदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा

डोर्लेवाडी : जिरायती भागाबरोबरच बागायती भागातदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू लागली आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी मेखळी सोनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या ४ गावांच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात येणार आहे. टंचाईमुळे चारही गावांतील ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा समितीने केले आहे. झारगडवाडी (बारामती) येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून मेखळी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी या ४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. वीर धरणात असलेल्या अत्यल्प पाणीसाठ्यामुळे लाभक्षेत्रातील गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चारही गावांतील पदाधिकारी व अधिकारी यांच्याशी चर्चा करून ५ मार्चपासून प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती समितीचे सचिव संजय म्हेत्रे यांनी दिली. या वेळी सोनगावचे सरपंच विकास माने, ग्रामविकास अधिकारी भास्कर शेंडे, मेखळीचे ग्रामविकास अधिकारी सुनील माने, झारगडवाडीचे ग्रामविकास अधिकारी कैलास कारंडे, डोर्लेवाडीचे सदस्य शंभू भोपळे, निवृत्ती नेवसे, सचिन निलाखे आदी उपस्थित होते.