शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

By admin | Updated: June 1, 2017 02:48 IST

बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर

पुणे : बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदा वाढणार आहेत. विज्ञान शाखेमधून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे या शाखेसाठी सर्वाधिक चुरस असणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची माहिती घेण्यात आली. प्रमुख महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत.पुणे जिल्हयातून ९०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख १६ हजार ११७ विद्यार्थी (९५.८५ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेतून ३ लाख २३ हजार ४१५ विद्यार्थी (९०.५७ टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ३ लाख ८९ हजार ८० विद्यार्थी (८१.९१ टक्के) उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेबरोबरच कला आणि वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. बारावी परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८१९ इतकी आहे. सर्व विद्यार्थ्यांमधून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार ७८४ इतकी आहे. मुंबई विभागातून ३ लाख १७ हजार ६१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. पुणे विभागातून २ लाख ३० हजार ८७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.तुकड्या वाढण्याची शक्यता कमीचबारावीच्या निकालामध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी महाविद्यालयांच्या तुकड्या वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण तुकड्या वाढविण्यासाठी यापूर्वीच विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. आता तुकड्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू करणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.