शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

By admin | Updated: June 1, 2017 02:48 IST

बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर

पुणे : बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदा वाढणार आहेत. विज्ञान शाखेमधून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे या शाखेसाठी सर्वाधिक चुरस असणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची माहिती घेण्यात आली. प्रमुख महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत.पुणे जिल्हयातून ९०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख १६ हजार ११७ विद्यार्थी (९५.८५ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेतून ३ लाख २३ हजार ४१५ विद्यार्थी (९०.५७ टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ३ लाख ८९ हजार ८० विद्यार्थी (८१.९१ टक्के) उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेबरोबरच कला आणि वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. बारावी परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८१९ इतकी आहे. सर्व विद्यार्थ्यांमधून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार ७८४ इतकी आहे. मुंबई विभागातून ३ लाख १७ हजार ६१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. पुणे विभागातून २ लाख ३० हजार ८७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.तुकड्या वाढण्याची शक्यता कमीचबारावीच्या निकालामध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी महाविद्यालयांच्या तुकड्या वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण तुकड्या वाढविण्यासाठी यापूर्वीच विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. आता तुकड्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू करणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.