शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदाही वाढणार

By admin | Updated: June 1, 2017 02:48 IST

बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर

पुणे : बारावीचा आॅनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला, निकालामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख महाविद्यालयांच्या प्रवेशाचे कटआॅफ यंदा वाढणार आहेत. विज्ञान शाखेमधून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामुळे या शाखेसाठी सर्वाधिक चुरस असणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या चौकशीसाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी बुधवारी महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रक्रियेची चौकशी केली. त्याचबरोबर महाविद्यालयांच्या संकेतस्थळावरून प्रवेशाची माहिती घेण्यात आली. प्रमुख महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी त्यांना पडलेल्या गुणांची टक्केवारी आॅनलाइन समजली असली तरी प्रत्यक्ष गुणपत्रिका ९ जून रोजी गुणपत्रिका मिळणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांना प्रवेश हव्या असलेल्या महाविद्यालयांचे आॅनलाइन अर्ज भरून ठेवता येणार आहेत.पुणे जिल्हयातून ९०.५९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख १६ हजार ११७ विद्यार्थी (९५.८५ टक्के) उत्तीर्ण झाले. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेतून ३ लाख २३ हजार ४१५ विद्यार्थी (९०.५७ टक्के) उत्तीर्ण झाले. कला शाखेतून ३ लाख ८९ हजार ८० विद्यार्थी (८१.९१ टक्के) उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेबरोबरच कला आणि वाणिज्य शाखेच्या कटआॅफमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. बारावी परीक्षेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ८१९ इतकी आहे. सर्व विद्यार्थ्यांमधून ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १० हजार ७८४ इतकी आहे. मुंबई विभागातून ३ लाख १७ हजार ६१५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३६ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. पुणे विभागातून २ लाख ३० हजार ८७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १७ हजार ४२७ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले.तुकड्या वाढण्याची शक्यता कमीचबारावीच्या निकालामध्ये ३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी महाविद्यालयांच्या तुकड्या वाढण्याची शक्यता कमी आहे. कारण तुकड्या वाढविण्यासाठी यापूर्वीच विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर करावे लागतात. आता तुकड्या वाढविण्याची प्रक्रिया सुरू करणे अवघड ठरणार आहे. त्यामुळे उपलब्ध जागेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.