शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

सहिष्णुतेमुळे संस्कृती टिकेल

By admin | Updated: September 14, 2015 04:44 IST

हिमालयाची उंची गाठणारी माणसे आज कुठल्याच क्षेत्रात राहिलेली नाही. फ्लॅटमध्ये दिसत नाहीत ते संस्कार दुष्काळी भागातील झोपडपट्टीत दिसतात.

पुणे : हिमालयाची उंची गाठणारी माणसे आज कुठल्याच क्षेत्रात राहिलेली नाही. फ्लॅटमध्ये दिसत नाहीत ते संस्कार दुष्काळी भागातील झोपडपट्टीत दिसतात. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याची ताकद आणि गुण सहिष्णुतेमध्येच आहे. काळ कितीही बदलला, तरी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, नव्या समाजाचा पाया घडविण्याची जबाबदारी ज्येष्ठांची आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे रविवारी कविवर्य नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी निंबाळकर बोलत होते. या वेळी यशवंतराव गडाख यांचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष बाळ महाले, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष मनोहर कोलते, कार्याध्यक्ष सचिन इटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे व्यासपीठावर होते.जन्मापासून अनेक अडचणींना सामोरे गेलेल्या सुर्वे यांच्या मनात कटूता आली कशी नाही, असा प्रश्न करून निंबाळकर म्हणाले, ‘‘वेदनेला आशेचा किरण देणारा हा कवी होऊन गेला. आज सर्व क्षेत्रांत निराशेचे वातावरण असले,तरी भारतीय संस्कृती टिकण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.’’ डॉ. सदानंद मोरे, मधुकर भावे, उल्हास पवार, डॉ. पी. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रभाकर साळुंके (उद्योगभूषण), सुभाष कड आणि कैलास आवटे (श्रमभूषण), अशोक शीलवंत (भला माणूस), ल. म. कडू आणि प्रा. मिलिंद रथकंठीवार (साहित्य), लता ऐवळे-कदम (सनद), तानाजी वाघोले (ग्रामभूषण) यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)