शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

संस्कारांतून संस्कृ ती टिकेल

By admin | Updated: May 12, 2016 01:06 IST

मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्याचे प्रमुख आव्हान आपल्यासमोर आहे. संतांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज आहे. संस्कारातूनच संस्कृतीचे रक्षण केले जाऊ शकते

चिंचवड : मूल्याधिष्ठित समाज निर्माण करण्याचे प्रमुख आव्हान आपल्यासमोर आहे. संतांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज आहे. संस्कारातूनच संस्कृतीचे रक्षण केले जाऊ शकते, असे मत शंकराचार्य विद्याभिनव शंकरभारती यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील श्रुतीसागर आश्रम पुणे आणि शिवशक्ती ज्ञानपीठाच्या वतीने आयोजित आद्य शंकराचार्य जयंती महोत्सवाच्या सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर स्वामी स्वरूपानंद सरस्वती, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, शिक्षणतज्ज्ञ मो. स. गोसावी, डॉ. बाबासाहेब तराणेकर, शिवकुमार विद्यानंद महास्वामी, डॉ. वंशीकृष्ण घनपाठी, स्वामी स्थितप्रज्ञानानंद सरस्वती आदी उपस्थित होते.या वेळी आदी शंकराचार्य पुरस्कार शिवकुमार विद्यानंद महास्वामी यांना, तर वेदसंवर्धन पुरस्कार डॉ. वंशीकृष्ण घनपाठी यांना प्रदान करण्यात आला. या वेळी शंकराचार्यांनी आद्य शंकराचार्यांचे अलौकिक कार्य, आजचा समाज, मानवी जीवन यांविषयी मार्गदर्शन केले. शिवकुमार विद्यानंद महास्वामी म्हणाले, ‘‘माणसे नुसतीच साक्षरा झाली आहेत. त्याचा उलट अर्थ घेतला, तर राक्षसा असा अर्थ होतो. या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. सामाजिक वर्तणूक, दायीत्व, समर्पित भावना जीवनात आवश्यक आहे. त्यातूनच जीवन आणि जगणे समृद्ध होणार आहे. पुण्यकर्माने, सद्गुणांनी जीवनात आनंद प्राप्त करता येतो.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘‘संत सहवास ही आनंदाची गोष्ट आहे. साधूसंत येती घरा, तोची दिवाळी, दसरा, अशी अवस्था आज आहे. संतांचे दर्शन झाल्याने आनंदतरंग उमटले आहेत. सत्त्वगुणांचे रक्षण झाले, तरच वैदिक धर्माचे रक्षण होणार आहे. संतांनी दिलेल्या मार्गावर आचरण केल्यास जीवनात आनंद प्राप्त करता येईल.’’ डी. वाय. पाटील विद्यापीठकडूनही सत्कार करण्यात आला. श्रीमद्भगवतगीता इंटरॅक्टिव्ह ध्वनिमुद्रिका आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.(वार्ताहर)