शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

सांस्कृतिक ‘स्मार्ट’नेसचे पालिकेला वावडे

By admin | Updated: October 27, 2015 00:55 IST

शिक्षणाचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे आयटी हबही झाले. अशा या पुणे शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पुणे : शिक्षणाचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे आयटी हबही झाले. अशा या पुणे शहराला स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या शहराची खरी ओळख गेली अनेक वर्षे साहित्य, संस्कृती, कला यामुळे आहे अशा या पुण्याचा सांस्कृतिक चेहरा स्मार्ट करण्याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचे महापालिकेच्या आराखड्यावरुन दिसून येते. पुणे स्मार्ट कसे होईल यासाठी नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत. पण यात सांस्कृतिक विभागाचा साधा उल्लेखही केलेला नाही ही मोठी खेदाची बाब आहे.माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे पुणे शहर अशी पुण्याची अलीकडची ओळख. पण पूर्वीपासून शिक्षणाचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी खरी ओळख. वर्षभरात अनेक महोत्सवांची रेलचेल असते. या महोत्सवांना देशातीलच नव्हे तर परदेशातील कलाकार पुण्यात येतात. त्यामुळे पुण्याची कीर्ती देशापुरती न राहता देशाच्या सीमा ओलांडूनही दूरवर गेली आहे. अशा या पुण्याचा सांस्कृतिक चेहरा स्मार्ट होण्यासाठी पुण्याचे कर्तेधर्ते उदासिन असल्याचे दिसून येत आहे. पुण्याचा गणेशोत्सव, पुणे फेस्टिव्हल, पुणे चित्रपट महोत्सव, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव असे काही ठळकपणे उल्लेख करता येण्यासारखे महोत्सव. या महोत्सवात फक्त पुणेकर रसिकच सहभागी होतात असे नाही तर देश विदेशातूनही रसिक हजेरी लावतात. विशेष म्हणजे शनिवार वाडा महोत्सव, रोहिणी भाटे, पठ्ठे बापूराव तसेच स्वरभास्कर पुरस्कार महापालिका देते. या पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात.कला, साहित्य, संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी मात्र ‘स्मार्ट’ आराखड्यात तरतुद नाही. रस्ते, वाहतूक, कचऱ्याची समस्या तसेच अनेक समस्या सोडविण्यासाठी ज्या प्रमाणे विभागवार सूचना मागविण्यात येत आहे त्या प्रमाणे आराखड्यात ‘सांस्कृतिक’ असा विभाग नाही. साहित्य, संस्कृती क्षेत्रातील कुण्या व्यक्तींनीही सूचना पाठविलेल्या नाहीत. शहराचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. पण त्या अनुषंगाने नाट्यगृहे, सभागृहे नाहीत. मोजकी नाट्यगृहे आहेत पण ती छोट्या-छोट्या कार्यक्रमांसाठी घेणे आयोजकांना परवडत नाही. महापालिकेची कलादालने आहेत ती मध्यवर्ती शहरात. लहान-लहान कार्यक्रमांसाठी मोठ्या नाट्यगृहे उपयोगाची नाहीत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या स्पर्धांसाठी तुलनेने कमी खर्चिक नाट्यगृहेच निवडली जातात. उद्यानांमध्ये कार्यक्रम घेण्यात हरित लवादाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे लहान-मोठे कार्यक्रम घ्यायचे कोठे असा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहेच. (प्रतिनिधी)