शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

१७५ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता

By admin | Updated: May 8, 2016 03:22 IST

चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू

सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू आहे. हा कारखानादेखील येत्या दोन-तीन दिवसांत बंद होणार आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून ७४२ लाख टन उसाचे गाळप केले, तर ८४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २१ लाख टनाने साखरेचे उत्पादन घटले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यातील १३२ कारखाने बंद झाले होते, तर ४५ साखर कारखाने सुरूच होते. त्यांच्या पुढे २५ लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान होते. जवळपास ३० हजार हेक्टरच्या आसपास ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले. चालू गळीत हंगामात आॅक्टोबर महिन्यात साखर कारखानदारी सुरू होण्याच्या सुरुवातीलाच राज्यातील ऊसतोड व वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या साखर कारखानदारीला नोव्हेंबर महिना उजाडला. कारखानदारी सुरळीत चालू होण्यासाठी १५ नोव्हेंबर उजाडले. वास्तविक यावर्षी राज्यातील उसाचे जादा क्षेत्र पाहता, आॅक्टोबर महिन्यातच साखर कारखानदारी सुरू होणे अपेक्षित असताना एक ते दीड महिना कारखाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. हेच कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू होणे गरजेचे होते. वेळेत कारखाने सुरू झाल्यानंतर गळीत हंगाम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला असता. सध्या राज्यातील आता १७७ साखर कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखाना वगळता १७५ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. विघ्नहर कारखानादेखील येत्या दोन- तीन दिवसांत बंद होत आहे. दुसरीकडे चालू हंगामात राज्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळून चालला होता. उसाचे टनेज घटत होते. त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यामध्ये विघ्नहर कारखान्याकडे सर्वांत जादा ऊस शिल्लक होता. तो कारखाना अजूनही सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्याचा साखर हंगाम एकदाचा संपला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पुढील हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांपुढे अंदाजे ५०० लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप आहे. चालू वर्षीच्या तुलनेत जवळपास २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार आहे. अजून उन्हाळ्याचा दीड महिना बाकी असून, यामध्येही काही प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट येण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एवढाच म्हणजे ११.३० टक्केचा साखर उतारा ठेवण्यामध्ये यश मिळविले. कारखाना अजून दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. चालू हंगामात १० लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले असून, कारखान्याकडे जवळपास २५ हजार एकरांवरील ऊस उपलब्ध होता. पुढील हंगामातही कारखाना ८ लाख टनाच्या आसपास गाळप करणार आहे. - सत्यशील शेरकर (अध्यक्ष, विघ्नहर कारखाना)