शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

१७५ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता

By admin | Updated: May 8, 2016 03:22 IST

चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू

सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू आहे. हा कारखानादेखील येत्या दोन-तीन दिवसांत बंद होणार आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून ७४२ लाख टन उसाचे गाळप केले, तर ८४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २१ लाख टनाने साखरेचे उत्पादन घटले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यातील १३२ कारखाने बंद झाले होते, तर ४५ साखर कारखाने सुरूच होते. त्यांच्या पुढे २५ लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान होते. जवळपास ३० हजार हेक्टरच्या आसपास ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले. चालू गळीत हंगामात आॅक्टोबर महिन्यात साखर कारखानदारी सुरू होण्याच्या सुरुवातीलाच राज्यातील ऊसतोड व वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या साखर कारखानदारीला नोव्हेंबर महिना उजाडला. कारखानदारी सुरळीत चालू होण्यासाठी १५ नोव्हेंबर उजाडले. वास्तविक यावर्षी राज्यातील उसाचे जादा क्षेत्र पाहता, आॅक्टोबर महिन्यातच साखर कारखानदारी सुरू होणे अपेक्षित असताना एक ते दीड महिना कारखाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. हेच कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू होणे गरजेचे होते. वेळेत कारखाने सुरू झाल्यानंतर गळीत हंगाम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला असता. सध्या राज्यातील आता १७७ साखर कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखाना वगळता १७५ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. विघ्नहर कारखानादेखील येत्या दोन- तीन दिवसांत बंद होत आहे. दुसरीकडे चालू हंगामात राज्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळून चालला होता. उसाचे टनेज घटत होते. त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यामध्ये विघ्नहर कारखान्याकडे सर्वांत जादा ऊस शिल्लक होता. तो कारखाना अजूनही सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्याचा साखर हंगाम एकदाचा संपला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पुढील हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांपुढे अंदाजे ५०० लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप आहे. चालू वर्षीच्या तुलनेत जवळपास २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार आहे. अजून उन्हाळ्याचा दीड महिना बाकी असून, यामध्येही काही प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट येण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एवढाच म्हणजे ११.३० टक्केचा साखर उतारा ठेवण्यामध्ये यश मिळविले. कारखाना अजून दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. चालू हंगामात १० लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले असून, कारखान्याकडे जवळपास २५ हजार एकरांवरील ऊस उपलब्ध होता. पुढील हंगामातही कारखाना ८ लाख टनाच्या आसपास गाळप करणार आहे. - सत्यशील शेरकर (अध्यक्ष, विघ्नहर कारखाना)