शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

१७५ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता

By admin | Updated: May 8, 2016 03:22 IST

चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू

सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू आहे. हा कारखानादेखील येत्या दोन-तीन दिवसांत बंद होणार आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून ७४२ लाख टन उसाचे गाळप केले, तर ८४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २१ लाख टनाने साखरेचे उत्पादन घटले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यातील १३२ कारखाने बंद झाले होते, तर ४५ साखर कारखाने सुरूच होते. त्यांच्या पुढे २५ लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान होते. जवळपास ३० हजार हेक्टरच्या आसपास ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले. चालू गळीत हंगामात आॅक्टोबर महिन्यात साखर कारखानदारी सुरू होण्याच्या सुरुवातीलाच राज्यातील ऊसतोड व वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या साखर कारखानदारीला नोव्हेंबर महिना उजाडला. कारखानदारी सुरळीत चालू होण्यासाठी १५ नोव्हेंबर उजाडले. वास्तविक यावर्षी राज्यातील उसाचे जादा क्षेत्र पाहता, आॅक्टोबर महिन्यातच साखर कारखानदारी सुरू होणे अपेक्षित असताना एक ते दीड महिना कारखाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. हेच कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू होणे गरजेचे होते. वेळेत कारखाने सुरू झाल्यानंतर गळीत हंगाम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला असता. सध्या राज्यातील आता १७७ साखर कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखाना वगळता १७५ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. विघ्नहर कारखानादेखील येत्या दोन- तीन दिवसांत बंद होत आहे. दुसरीकडे चालू हंगामात राज्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळून चालला होता. उसाचे टनेज घटत होते. त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यामध्ये विघ्नहर कारखान्याकडे सर्वांत जादा ऊस शिल्लक होता. तो कारखाना अजूनही सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्याचा साखर हंगाम एकदाचा संपला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पुढील हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांपुढे अंदाजे ५०० लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप आहे. चालू वर्षीच्या तुलनेत जवळपास २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार आहे. अजून उन्हाळ्याचा दीड महिना बाकी असून, यामध्येही काही प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट येण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एवढाच म्हणजे ११.३० टक्केचा साखर उतारा ठेवण्यामध्ये यश मिळविले. कारखाना अजून दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. चालू हंगामात १० लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले असून, कारखान्याकडे जवळपास २५ हजार एकरांवरील ऊस उपलब्ध होता. पुढील हंगामातही कारखाना ८ लाख टनाच्या आसपास गाळप करणार आहे. - सत्यशील शेरकर (अध्यक्ष, विघ्नहर कारखाना)