शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

१७५ कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता

By admin | Updated: May 8, 2016 03:22 IST

चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू

सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामात राज्यातील सुरू असलेल्या १७७ साखर कारखान्यांपैकी १७५ कारखान्यांचा गळीत हंगाम पूर्ण झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विघ्नहर कारखाना अद्याप सुरू आहे. हा कारखानादेखील येत्या दोन-तीन दिवसांत बंद होणार आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून ७४२ लाख टन उसाचे गाळप केले, तर ८४० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २१ लाख टनाने साखरेचे उत्पादन घटले आहे. एक महिन्यापूर्वी राज्यातील १३२ कारखाने बंद झाले होते, तर ४५ साखर कारखाने सुरूच होते. त्यांच्या पुढे २५ लाख टन ऊस गाळप करण्याचे आव्हान होते. जवळपास ३० हजार हेक्टरच्या आसपास ऊस शेतातच उभा आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेत गाळप केले. चालू गळीत हंगामात आॅक्टोबर महिन्यात साखर कारखानदारी सुरू होण्याच्या सुरुवातीलाच राज्यातील ऊसतोड व वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला होता. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या साखर कारखानदारीला नोव्हेंबर महिना उजाडला. कारखानदारी सुरळीत चालू होण्यासाठी १५ नोव्हेंबर उजाडले. वास्तविक यावर्षी राज्यातील उसाचे जादा क्षेत्र पाहता, आॅक्टोबर महिन्यातच साखर कारखानदारी सुरू होणे अपेक्षित असताना एक ते दीड महिना कारखाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. हेच कारखाने आॅक्टोबर महिन्यात सुरू होणे गरजेचे होते. वेळेत कारखाने सुरू झाल्यानंतर गळीत हंगाम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाला असता. सध्या राज्यातील आता १७७ साखर कारखान्यांपैकी पुणे जिल्ह्यातील विघ्नहर कारखाना वगळता १७५ साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. विघ्नहर कारखानादेखील येत्या दोन- तीन दिवसांत बंद होत आहे. दुसरीकडे चालू हंगामात राज्यातील शेतीच्या पाण्याची परिस्थीती अत्यंत गंभीर आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळून चालला होता. उसाचे टनेज घटत होते. त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले. २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार जिल्ह्यामध्ये विघ्नहर कारखान्याकडे सर्वांत जादा ऊस शिल्लक होता. तो कारखाना अजूनही सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साखर कारखान्याचा साखर हंगाम एकदाचा संपला असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता पुढील हंगामासाठी राज्यातील साखर कारखान्यांपुढे अंदाजे ५०० लाख टनांच्या आसपास उसाचे गाळप आहे. चालू वर्षीच्या तुलनेत जवळपास २५० लाख टनाने उसाचे क्षेत्र घटणार आहे. अजून उन्हाळ्याचा दीड महिना बाकी असून, यामध्येही काही प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट येण्याची चिन्हे आहेत. साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एवढाच म्हणजे ११.३० टक्केचा साखर उतारा ठेवण्यामध्ये यश मिळविले. कारखाना अजून दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. चालू हंगामात १० लाख ६६ हजार टन उसाचे गाळप केले असून, कारखान्याकडे जवळपास २५ हजार एकरांवरील ऊस उपलब्ध होता. पुढील हंगामातही कारखाना ८ लाख टनाच्या आसपास गाळप करणार आहे. - सत्यशील शेरकर (अध्यक्ष, विघ्नहर कारखाना)