शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
Sonam Raghuvanshi : "सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
6
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
7
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...
8
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
9
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
10
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
11
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
12
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
13
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
14
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
15
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
16
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
17
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
18
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
19
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
20
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...

गुन्हेगारी टोळ््यांच्या आवळल्या मुसक्या

By admin | Updated: December 22, 2015 01:34 IST

जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ््यांवर वचक बसविण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी १४ टोळ््यांमधील तब्बल १२४ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून

पुणे : जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ््यांवर वचक बसविण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी १४ टोळ््यांमधील तब्बल १२४ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करून मुसक्या आवळल्या आहेत. यापुढेही जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी टोळ््यांवर कारवाई सुरूच राहील, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्पष्ट केले.पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ग्रामीणच्या अधीक्षकपदाची मे २०१५ मध्ये सूत्रे हातात घेतली. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी १४ गुन्हेगारी टोळ््यांमधील तब्बल १२४ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. आगामी काळात आणखी चार गुन्हेगारी टोळयांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये राम बाळू केदारी (रा. कोथरूड), पिंट्या ऊर्फ सुनील दीपक वाघमारे (रा. लोणावळा), शाम रामचंद्र दाभाडे (रा. तळेगाव दाभाडे), संतोष कांतिलाल गुजर (रा. चाकण), प्रवीण मारुती कुंजीर (रा. लोणी काळभोर), पप्पू गणपत उत्तेकर (रा. पौड), महेश चंद्रकांत कमलापुरे (रा. पुणे), रोहिदास अनंता चोरगे (रा. वेल्हा), सागर दादा कामठे (रा. करमाळा), सोबत हिमला मछार (रा. छाबुवा, मध्य प्रदेश), तुषार नामदेव हंबीर (रा. हडपसर), सागर कल्याण रजपूत (रा. पुणे) आणि विजय तुळशीराम चव्हाण (रा. ठाणे) यांच्या टोळ््यांतील गुन्हेगारांचा समावेश आहे. तसेच भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख सागर कल्याण रजपूत व संजय भीमराव रजपूत यांनी वाळूतस्करीच्या वादातून खून केला होता. त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यासाठी मंजुरी मिळाली असून तपास चालू आहे. भविष्यात अशा प्रकारची गुन्हेगारी टोळी करून घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्याचा अधिक सखोल तपास करणार असल्याचे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)