शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी पट्ट्यात फुलू लागली ऊसशेती

By admin | Updated: December 26, 2016 02:16 IST

पुरंदर तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते.

मामासाहेब गायकवाड / भुलेश्वरपुरंदर तालुका कायमस्वरुपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. यामुळे येथील शेतीला ही तारेवरची कसरत आहे. पण गेली पाच वर्षे तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आले आणि पुरंदरची माळराने बागायती झाली. एवढेच नव्हे, तर चक्क बागायती जमिनीत मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या. यामुळे पुरंदरचा पूर्वपट्टा कायमस्वरुपी दुष्काळी असतानाच मात्र ऊसशेती फुलू लागली. पुरंदर तालुक्यात कायमस्वरुपी दुष्काळी असणारा पूर्वपट्टा पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कायमस्वरुपी दुष्काळी ओळख पुसून बागायतदार झाला. पुण्याचे वापर केलेले पाणी मुळा-मुठा नदीमध्ये सोडून पंपाद्वारे उचलण्यात आले आहे. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू राहण्याला कोणत्याही धरणाची गरज नाही. यामुळे पुण्याला जेवढे जास्त पाणी मिळेल, तेवढे पाणी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला मिळते. यामुळे या योजनेला सहसा पाणी कमी पडत नाही. पुरंदर तालुक्यात अनेक गावे आठमाही बागायतदार आहेत. उर्वरित चार महिने दुसऱ्या तालुक्यातील गावात रोजंदारीशिवाय पर्याय नव्हता. मात्र पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार झाली आणि आठमाही बागायतदार असणारा तालुका बारमाही बागायतदार झाला. पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, की राज्य शासन मोफत पाणी सोडते. यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक गावांतील पाण्यासाठीची चणचण दूर झाली. हे पाणी, ओढे, नाले, मोठमोठी तळी यामध्ये सोडल्याने तालुक्यातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे अनेक विहिरी बारमाही पाण्याच्या झाल्या. टोमॅटो, वाटाणा, फुले या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेणे सुरू झाले. कायमस्वरूपी पाणी सुटणाऱ्या भागात आता तर चक्क उसाचे फड डोलू लागले आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी सणसमळा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. आंबळे गावच्या हद्दीतून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सोडण्यात येते. ते थेट सणसमळा म्हणजेच राजेवाडी तलावात येते. येथील शेतकरी वेळेवर पैसे भरून पाणी घेतात. पैसे भरण्याचे त्यांनी जवळपास वेळापत्रकच तयार केले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे एकही पीक वाया जात नाही. पिकाला वेळेवर पाणी मिळत असल्याने फळे, फुले, विविध पिकाबरोबरच चक्क उसाची शेती फुलू लागली आहे.

ऊस सोमेश्वर सहकारी साखर कारखाना व दौंड शुगर साखर कारखाना या ठिकाणी पाठविला जातो. यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. याकामी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता साहेबराव भोसले यांची चांगलीच मदत होते. त्यांच्या योग्य नियोजनामुळे आज ही योजना सुरळीत चालू आहे. एकंदरीत पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रात नक्कीच वाढ झाली आहे.- रामदास सणस, पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे लाभार्थी शेतकरी पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पुरंदर तालुक्यात आल्यामुळे येथील शेती बारमाही बागायतदार झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी उसाची शेती डोलू लागली आहे. सर्वसामान्य माणसांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. - गणेश ढोल, दौंड शुगर कृषी अधिकारी