शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले आहे. मात्र, या दरवर्षीच्या पीक कर्जमाफी योजनांमुळे पीककर्जाची नियमित फेड करणाऱ्यांच्या संख्येत घट होऊ लागल्याचे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यात ४२ बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येते. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची अग्रणी बँक आहे. त्यांच्याकडील आकडेवारीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात ( सन २०२०-२१) ३ लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. या कर्जाची एकूण रक्कम ३ हजार १७९ कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंतची आहे. ३१ मार्च, २०२१ पर्यंत यात आणखी वाढ होऊ शकते.

मागील वर्षी ( सन २०१९-२०) याच बँकांकडून जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकर्यांना पीककर्ज देण्यात आले होते. ती एकूण रक्कम २ हजार ८६१ कोटी रुपये होते.

मागील आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ८१ हजार ५९७ जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. मागील वर्षीपेक्षा कर्जाची रक्कमही ३१८ कोटी रुपयांनी जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेमुळेच बँकांनी या वर्षी जास्त कर्ज दिले आहे.

कर्जमाफी दिली की, सरकारकडून बँकांना माफी दिलेल्या रकमेचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून मिळणार नाही, ते कर्ज या पद्धतीने मिळत असल्याने असा निर्णय झाला की, बँका त्वरेने शेतकऱ्यांना नवे कर्ज ऊपलब्ध करून देतात. त्यामुळेच या वर्षी जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या कर्जमुक्ती योजनांमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. कर्जमुक्ती योजनेचे निकष असतात. अल्प भूधारक, किती कर्ज आहे, किती हप्ते थकले आहेत, कधीपासून थकलेत अशा अटींचा, नियमांचा त्यात समावेश असतो. त्याचाही विचार आता कर्ज घेताना शेतकऱ्यांकडून केला जातो, असे काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी नव्या पीक कर्जाला पात्र ठरले. मागणी झाली की, त्यांना नव्याने पीक कर्ज देणे बँकांवर बंधनकारक आहे. त्यामुळे संख्या वाढली आहे.

- आनंद बेडेकर-महाप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक

---------

शेती चांगली झाली तर कर्जफेड केली जातेच, पण नैसर्गिक आपत्तीमुळे पीक गेले की, कर्जाचे हप्ते थकून व्याज वाढत जाते. कर्जमाफी योजना अशा वेळी उपयोगी पडते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे आमचा फायदा झाला आहे.

- भीमराव बागल - मंचर