शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले आहे. मात्र, या दरवर्षीच्या पीक कर्जमाफी योजनांमुळे पीककर्जाची नियमित फेड करणाऱ्यांच्या संख्येत घट होऊ लागल्याचे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यात ४२ बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येते. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची अग्रणी बँक आहे. त्यांच्याकडील आकडेवारीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात ( सन २०२०-२१) ३ लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. या कर्जाची एकूण रक्कम ३ हजार १७९ कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंतची आहे. ३१ मार्च, २०२१ पर्यंत यात आणखी वाढ होऊ शकते.

मागील वर्षी ( सन २०१९-२०) याच बँकांकडून जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकर्यांना पीककर्ज देण्यात आले होते. ती एकूण रक्कम २ हजार ८६१ कोटी रुपये होते.

मागील आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ८१ हजार ५९७ जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. मागील वर्षीपेक्षा कर्जाची रक्कमही ३१८ कोटी रुपयांनी जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेमुळेच बँकांनी या वर्षी जास्त कर्ज दिले आहे.

कर्जमाफी दिली की, सरकारकडून बँकांना माफी दिलेल्या रकमेचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून मिळणार नाही, ते कर्ज या पद्धतीने मिळत असल्याने असा निर्णय झाला की, बँका त्वरेने शेतकऱ्यांना नवे कर्ज ऊपलब्ध करून देतात. त्यामुळेच या वर्षी जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या कर्जमुक्ती योजनांमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. कर्जमुक्ती योजनेचे निकष असतात. अल्प भूधारक, किती कर्ज आहे, किती हप्ते थकले आहेत, कधीपासून थकलेत अशा अटींचा, नियमांचा त्यात समावेश असतो. त्याचाही विचार आता कर्ज घेताना शेतकऱ्यांकडून केला जातो, असे काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी नव्या पीक कर्जाला पात्र ठरले. मागणी झाली की, त्यांना नव्याने पीक कर्ज देणे बँकांवर बंधनकारक आहे. त्यामुळे संख्या वाढली आहे.

- आनंद बेडेकर-महाप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक

---------

शेती चांगली झाली तर कर्जफेड केली जातेच, पण नैसर्गिक आपत्तीमुळे पीक गेले की, कर्जाचे हप्ते थकून व्याज वाढत जाते. कर्जमाफी योजना अशा वेळी उपयोगी पडते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे आमचा फायदा झाला आहे.

- भीमराव बागल - मंचर