शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले आहे. मात्र, या दरवर्षीच्या पीक कर्जमाफी योजनांमुळे पीककर्जाची नियमित फेड करणाऱ्यांच्या संख्येत घट होऊ लागल्याचे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यात ४२ बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येते. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची अग्रणी बँक आहे. त्यांच्याकडील आकडेवारीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात ( सन २०२०-२१) ३ लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. या कर्जाची एकूण रक्कम ३ हजार १७९ कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंतची आहे. ३१ मार्च, २०२१ पर्यंत यात आणखी वाढ होऊ शकते.

मागील वर्षी ( सन २०१९-२०) याच बँकांकडून जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकर्यांना पीककर्ज देण्यात आले होते. ती एकूण रक्कम २ हजार ८६१ कोटी रुपये होते.

मागील आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ८१ हजार ५९७ जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. मागील वर्षीपेक्षा कर्जाची रक्कमही ३१८ कोटी रुपयांनी जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेमुळेच बँकांनी या वर्षी जास्त कर्ज दिले आहे.

कर्जमाफी दिली की, सरकारकडून बँकांना माफी दिलेल्या रकमेचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून मिळणार नाही, ते कर्ज या पद्धतीने मिळत असल्याने असा निर्णय झाला की, बँका त्वरेने शेतकऱ्यांना नवे कर्ज ऊपलब्ध करून देतात. त्यामुळेच या वर्षी जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या कर्जमुक्ती योजनांमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. कर्जमुक्ती योजनेचे निकष असतात. अल्प भूधारक, किती कर्ज आहे, किती हप्ते थकले आहेत, कधीपासून थकलेत अशा अटींचा, नियमांचा त्यात समावेश असतो. त्याचाही विचार आता कर्ज घेताना शेतकऱ्यांकडून केला जातो, असे काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी नव्या पीक कर्जाला पात्र ठरले. मागणी झाली की, त्यांना नव्याने पीक कर्ज देणे बँकांवर बंधनकारक आहे. त्यामुळे संख्या वाढली आहे.

- आनंद बेडेकर-महाप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक

---------

शेती चांगली झाली तर कर्जफेड केली जातेच, पण नैसर्गिक आपत्तीमुळे पीक गेले की, कर्जाचे हप्ते थकून व्याज वाढत जाते. कर्जमाफी योजना अशा वेळी उपयोगी पडते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे आमचा फायदा झाला आहे.

- भीमराव बागल - मंचर