शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

पीक कर्जमुक्तीने वाढले कर्जबाजारीपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सरकारकडून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राबवली गेल्याने, जिल्ह्यातील बँकाकडून यंदा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले आहे. मात्र, या दरवर्षीच्या पीक कर्जमाफी योजनांमुळे पीककर्जाची नियमित फेड करणाऱ्यांच्या संख्येत घट होऊ लागल्याचे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे.

जिल्ह्यात ४२ बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात येते. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची अग्रणी बँक आहे. त्यांच्याकडील आकडेवारीनुसार यंदाच्या आर्थिक वर्षात ( सन २०२०-२१) ३ लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात आले आहे. या कर्जाची एकूण रक्कम ३ हजार १७९ कोटी रुपये इतकी आहे. ही आकडेवारी २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंतची आहे. ३१ मार्च, २०२१ पर्यंत यात आणखी वाढ होऊ शकते.

मागील वर्षी ( सन २०१९-२०) याच बँकांकडून जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार शेतकर्यांना पीककर्ज देण्यात आले होते. ती एकूण रक्कम २ हजार ८६१ कोटी रुपये होते.

मागील आर्थिक वर्षापेक्षा या वर्षी आतापर्यंत ८१ हजार ५९७ जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात आले. मागील वर्षीपेक्षा कर्जाची रक्कमही ३१८ कोटी रुपयांनी जास्त आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेमुळेच बँकांनी या वर्षी जास्त कर्ज दिले आहे.

कर्जमाफी दिली की, सरकारकडून बँकांना माफी दिलेल्या रकमेचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांकडून मिळणार नाही, ते कर्ज या पद्धतीने मिळत असल्याने असा निर्णय झाला की, बँका त्वरेने शेतकऱ्यांना नवे कर्ज ऊपलब्ध करून देतात. त्यामुळेच या वर्षी जास्त शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे.

दरम्यान, सातत्याने होत असलेल्या कर्जमुक्ती योजनांमुळे नियमित कर्ज फेडणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे, असे बँक अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. कर्जमुक्ती योजनेचे निकष असतात. अल्प भूधारक, किती कर्ज आहे, किती हप्ते थकले आहेत, कधीपासून थकलेत अशा अटींचा, नियमांचा त्यात समावेश असतो. त्याचाही विचार आता कर्ज घेताना शेतकऱ्यांकडून केला जातो, असे काही बँक अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

कर्जमुक्तीमुळे अनेक शेतकरी नव्या पीक कर्जाला पात्र ठरले. मागणी झाली की, त्यांना नव्याने पीक कर्ज देणे बँकांवर बंधनकारक आहे. त्यामुळे संख्या वाढली आहे.

- आनंद बेडेकर-महाप्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक

---------

शेती चांगली झाली तर कर्जफेड केली जातेच, पण नैसर्गिक आपत्तीमुळे पीक गेले की, कर्जाचे हप्ते थकून व्याज वाढत जाते. कर्जमाफी योजना अशा वेळी उपयोगी पडते. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेमुळे आमचा फायदा झाला आहे.

- भीमराव बागल - मंचर