शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कलचाचणी : आभास की वास्तव?

By admin | Updated: April 19, 2017 04:07 IST

कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा

पुणे : कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा. तसेच, त्यांच्याकडून दाखविल्या जाणाऱ्या दिशादर्शनावर पूर्णत: विसंबून न राहता शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यंकाची, आवडीनिवडीची तपासणी केल्यानंतर मार्गदर्शनानुसार करिअरची निवड करा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.दहावी-बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. काही पालक आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षितांचा सल्ला घेतात, तर काही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचीच निवड करतात. परंतु, काही वर्षांपासून पालकांमध्ये जागृती झाली आहे. करिअर मार्गदर्शकांकडून सल्ला घेऊन विद्यार्थ्यांचा कल तपासून अभ्यासक्रम निवडीबाबत निर्णय घेतला जात आहे. राज्य शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच, काही खासगी संस्थांकडून अवाच्या सवा शुल्क आकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, बुद्ध्यंक, आवडीनिवडी, गणित, भाषा विषयातील ज्ञान आदींच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या कलचाचणीनुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व करिअर निवडणे उचित ठरणार आहे.राज्य शासनाच्या विद्या प्राधिकरणांतर्गत पुण्यात विभागीय व्यवस्थापन मार्गदर्शन व निवड संस्थेच्या माध्यमातून मानसशास्त्रीय कसोटीद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. प्रत्येक सोमवारी सुमारे ५० ते ६५ विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या घेऊन त्यांचा बुद्ध्यंक तपासला जातो. तसेच, शासनाच्या कोणत्या संस्थेमधील कोणता अभ्यासक्रम निवडता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आवड असते; परंतु त्याची क्षमता नसते. त्यामुळे त्याला डॉक्टर होता आले नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात तो कोणते करिअर करू शकेल, या संदर्भातील योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे कलचाचणी करून घेणे योग्य आहे.(प्रतिनिधी)