शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

कलचाचणी : आभास की वास्तव?

By admin | Updated: April 19, 2017 04:07 IST

कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा

पुणे : कलचाचणीच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर विद्यार्थ्याचे करिअर धुळीस मिळू शकते. त्यामुळे कलचाचणीच्या नावावर दुकाने थाटून बसणाऱ्यांपासून सावध राहा. तसेच, त्यांच्याकडून दाखविल्या जाणाऱ्या दिशादर्शनावर पूर्णत: विसंबून न राहता शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यंकाची, आवडीनिवडीची तपासणी केल्यानंतर मार्गदर्शनानुसार करिअरची निवड करा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.दहावी-बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाची निवड करावी, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असते. काही पालक आपल्या कुटुंबातील उच्च शिक्षितांचा सल्ला घेतात, तर काही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींनी निवडलेल्या अभ्यासक्रमाचीच निवड करतात. परंतु, काही वर्षांपासून पालकांमध्ये जागृती झाली आहे. करिअर मार्गदर्शकांकडून सल्ला घेऊन विद्यार्थ्यांचा कल तपासून अभ्यासक्रम निवडीबाबत निर्णय घेतला जात आहे. राज्य शासनातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच, काही खासगी संस्थांकडून अवाच्या सवा शुल्क आकारून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. परंतु, बुद्ध्यंक, आवडीनिवडी, गणित, भाषा विषयातील ज्ञान आदींच्या आधारे शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या कलचाचणीनुसार विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम व करिअर निवडणे उचित ठरणार आहे.राज्य शासनाच्या विद्या प्राधिकरणांतर्गत पुण्यात विभागीय व्यवस्थापन मार्गदर्शन व निवड संस्थेच्या माध्यमातून मानसशास्त्रीय कसोटीद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन केले जाते. प्रत्येक सोमवारी सुमारे ५० ते ६५ विद्यार्थ्यांच्या विविध चाचण्या घेऊन त्यांचा बुद्ध्यंक तपासला जातो. तसेच, शासनाच्या कोणत्या संस्थेमधील कोणता अभ्यासक्रम निवडता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आवड असते; परंतु त्याची क्षमता नसते. त्यामुळे त्याला डॉक्टर होता आले नाही, तर वैद्यकीय क्षेत्रात तो कोणते करिअर करू शकेल, या संदर्भातील योग्य माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यामुळे कलचाचणी करून घेणे योग्य आहे.(प्रतिनिधी)