शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

अठरा गावांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:09 IST

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांसह करंजविहिरे ते चाकण दरम्यानच्या जलवाहिनीला खेटून असलेल्या गावांना वाजवी दरात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला ...

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांसह करंजविहिरे ते चाकण दरम्यानच्या जलवाहिनीला खेटून असलेल्या गावांना वाजवी दरात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक दोनमधील कंपन्या तसेच वासुली, भांबोली, वराळे, आंबेठाण, बिरदवडी, खराबवाडी आदी ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून गेली १० ते १२ वर्षे या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाणीपुरवठा केला जातो आहे. परंतु सध्या स्थानिक लोकसंख्येच्या तीन ते चार पट वाढलेल्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी या योजना कमी पडत आहेत. या योजनेची पाणी साठवण क्षमता आणि वितरण व्यवस्था मर्यादित स्वरूपाची आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची सध्याची पाणी साठवणूक क्षमता सरासरी पन्नास टक्केच आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या जलवाहिनीतून सर्व गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रत्येक दिवशी पाणी योजनेची मोटार १२ ते १८ तास सलग सुरू ठेवावी लागते. यामुळे ग्रामपंचायतीना अधिकचा भार सहन करावा लागतो.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चाकण एमआयडीसी, म्हाळुंगे कोविड सेंटर, म्हाळुंगे गाव, खराबवाडी आदी गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेशे पाणी मिळत नाही. ग्रामपंचायतीना पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व्ह २४ तास सुरू असायचा, आता मात्र फक्त १२ तास हा व्हॉल्व्ह सुरू ठेवून पाणी उचलण्याच्या तोंडी सूचना ग्रामपंचायतीना देण्यात आल्या आहेत. यावर एमजीपीचे कर्मचारी स्वतः लक्ष ठेवून १२ तास होताच ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित केला जातो आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेत आवश्यक पाणी साठवणूक होत नसल्याने नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे. प्रत्येक गावाला दीड ते दोन लाख लिटर पाणी लागते; मात्र सध्या १२ तासांत फक्त ९० हजार ते एक लाख लिटर पाणी मिळत आहे. यामुळे भविष्यात आणखीन पाणी कपातीचे संकट स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

थकबाकी व मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी देता येत नसल्याने जलवाहिनीचे व्हॉल्व्ह बंद केले जातात. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर म्हाळुंगे कोविड सेंटरला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कालमर्यादेत बदल केला असे कर्मचारी सांगत आहेत. यामध्ये विसंगती आढळत असून जर थकबाकीमुळे पाणीपुरवठा खंडित केला जातो आहे, मग ज्यांचे वैयक्तिक नळ जोडणी बिले भरले असतानाही त्याचे व्हॉल्व्ह का बंद केले जातात? एकंदरीत ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात सुसूत्रता नसून सावळा गोंधळ दिसून येत आहे.

ग्रामपंचायतींकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. याबाबत त्यांना सविस्तर थकबाकी नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नाही. कोरोनाचे कारण पुढे करून वेळ ढकलली जात आहे. त्यात विशेष म्हणजे सर्वच ग्रामपंचायती मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत आहेत. अधिकचे पाणी घेण्यासाठी जिल्हा परिषदकडून नव्याने पाणी योजना करावी लागेल. चाकण पालिकेने स्वतःची पाणी योजना आखली असून, ती पूर्ण झाल्यावर शिल्लक पाणी साठ्यातून ग्रामपंचायतींना ते पाणी देता येईल. मात्र थकबाकी पूर्णपणे भरल्यास विचार करू. - संजय पाठक, मुख्य कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

--------------------------------------------------------

* फोटो - भामा आसखेड धरण.