शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पुन्हा बटाटा लागवडीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

मंचर : जूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मॉन्सूनने ब्रेक घेतला आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी पाऊस पडण्याची ...

मंचर : जूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मॉन्सूनने ब्रेक घेतला आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी पाऊस पडण्याची चिन्हे काही दिसत नाही. पावसाअभावी पिके धोक्यात आली असून सातगाव पठारावरील बटाटा पिकाची पुन्हा एकदा लागवड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार लागवडीचे संकट ओढवले असून मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्वी लागवडीसाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भाग बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड या सात गावांत दरवर्षी सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली जाते. मागील वर्षी बटाटा पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका दिला. निसर्गाची अवकृपा तसेच कमी बाजारभाव यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे भांडवल वसूल झाले नाही. शेतकरी कर्ज काढून भांडवल उपलब्ध करत बटाटा पीक घेतो. मात्र, मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फटका बसून भांडवल अंगावर आले. त्याचा परिणाम या वर्षीच्या बटाटा लागवडीवर झाला आहे. मागील वर्षीचा तोटा यामुळे या वर्षी बटाटा लागवड कमी झाल्याची माहिती भावडी येथील अशोक बाजारे यांनी दिली.

बटाटा पिकाला एकरी साठ हजार रुपये भांडवली खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने बटाटा लागवड केली आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. दिवसभर कडक ऊन पडलेले असते. परिणामी बटाटा पीक धोक्यात आले आहे. लागवड झालेले बटाटा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुबार लागवडीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र पहिल्याच लागवडीला शेतकऱ्याकडे भांडवल नव्हते. कर्ज काढून त्यांनी भांडवल कसेबसे उभे केले. त्यामुळे दुसऱ्यांदा बटाटा लागवड करायची झाली तर भांडवल उभे कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर बटाटा पीक पूर्णपणे वाया जाणार आहे. या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बटाटा पिकाचा राष्ट्रीय पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी हुंडेकरी व्यावसायिक राम तोडकर, अशोकराव बाजारे यांनी केली आहे.

कमी भांडवली पिकांकडे वाढला कल

बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत असताना कोरोनाच्या संकटालाही सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याने बटाट्याला अपेक्षित अशी मागणी नव्हती. भविष्यात ती वाढेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी कमी भांडवल असलेल्या पिकांकडे या वर्षी वळाला आहे. सातगाव पठार भागात या वर्षी केवळ पाच हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यासाठी तीन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावाने बियाणे आणले आहे. तर कमी भांडवल असणाऱ्या सोयाबीन, वाटाणा, फरशी, बीट, भुईमूग,मेथी, कोथिंबीर या पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याची माहिती कोल्हारवाडी येथील जयसिंग एरंडे यांनी दिली.

०८ मंचर

सातगाव पठार भागात बटाटा लागवड झाली असून, पावसाअभावी बटाट्याची उगवण झालेली नाही.