शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पावसाअभावी पुन्हा बटाटा लागवडीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:08 IST

मंचर : जूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मॉन्सूनने ब्रेक घेतला आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी पाऊस पडण्याची ...

मंचर : जूनच्या सुरुवातीला सुरू झालेल्या मॉन्सूनने ब्रेक घेतला आहे. जुलै महिन्यातील पहिला आठवडा संपत आला तरी पाऊस पडण्याची चिन्हे काही दिसत नाही. पावसाअभावी पिके धोक्यात आली असून सातगाव पठारावरील बटाटा पिकाची पुन्हा एकदा लागवड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार लागवडीचे संकट ओढवले असून मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्वी लागवडीसाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भाग बटाटा पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ, पारगावतर्फे खेड या सात गावांत दरवर्षी सुमारे दहा हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली जाते. मागील वर्षी बटाटा पिकाने शेतकऱ्यांना चांगलाच फटका दिला. निसर्गाची अवकृपा तसेच कमी बाजारभाव यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे भांडवल वसूल झाले नाही. शेतकरी कर्ज काढून भांडवल उपलब्ध करत बटाटा पीक घेतो. मात्र, मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांना फटका बसून भांडवल अंगावर आले. त्याचा परिणाम या वर्षीच्या बटाटा लागवडीवर झाला आहे. मागील वर्षीचा तोटा यामुळे या वर्षी बटाटा लागवड कमी झाल्याची माहिती भावडी येथील अशोक बाजारे यांनी दिली.

बटाटा पिकाला एकरी साठ हजार रुपये भांडवली खर्च येतो. अनेक शेतकऱ्यांनी धाडसाने बटाटा लागवड केली आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी बटाटा लागवड केली. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. दिवसभर कडक ऊन पडलेले असते. परिणामी बटाटा पीक धोक्यात आले आहे. लागवड झालेले बटाटा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, दुबार लागवडीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र पहिल्याच लागवडीला शेतकऱ्याकडे भांडवल नव्हते. कर्ज काढून त्यांनी भांडवल कसेबसे उभे केले. त्यामुळे दुसऱ्यांदा बटाटा लागवड करायची झाली तर भांडवल उभे कसे करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

येत्या आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर बटाटा पीक पूर्णपणे वाया जाणार आहे. या भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बटाटा पिकाचा राष्ट्रीय पीक विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी हुंडेकरी व्यावसायिक राम तोडकर, अशोकराव बाजारे यांनी केली आहे.

कमी भांडवली पिकांकडे वाढला कल

बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत असताना कोरोनाच्या संकटालाही सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद असल्याने बटाट्याला अपेक्षित अशी मागणी नव्हती. भविष्यात ती वाढेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी कमी भांडवल असलेल्या पिकांकडे या वर्षी वळाला आहे. सातगाव पठार भागात या वर्षी केवळ पाच हजार एकर क्षेत्रावर बटाटा लागवड झाल्याचा अंदाज आहे. त्यासाठी तीन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल या बाजारभावाने बियाणे आणले आहे. तर कमी भांडवल असणाऱ्या सोयाबीन, वाटाणा, फरशी, बीट, भुईमूग,मेथी, कोथिंबीर या पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याची माहिती कोल्हारवाडी येथील जयसिंग एरंडे यांनी दिली.

०८ मंचर

सातगाव पठार भागात बटाटा लागवड झाली असून, पावसाअभावी बटाट्याची उगवण झालेली नाही.