शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

आचारसंहितेचा भंग झाल्यास गुन्हे

By admin | Updated: September 19, 2014 00:37 IST

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी. यासाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.

चाकण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी. यासाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. निवडणुकीचा काळ हा संवेदनशील असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व निवडणूक पूर्ण होईर्पयत चुकूनही आचार संहितेचा भंग होऊ नये. याकडे सर्वच पक्षांनी कटाक्षाने लक्ष द्यावे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील यांनी येथे दिल्या.
चाकण पोलीस ठाण्यात काल (दि.17) सर्वपक्षीय प्रमुख पदाधिका:यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील, पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांनी याबाबत सक्त सूचना सर्वपक्षीय पदाधिका:यांना केल्या. पदाधिकारी व कार्यकत्र्यानी सोशल मीडियाला संयमाने हाताळण्याची गरज आहे. कुठल्याही स्थितीत कसलाही तेढ निर्माण करणारा आक्षेपार्ह मजकूर कुणीही पसरवू नये, निवडणूक काळात फिरविण्यात येणा:या उमेदवारांच्या रथांची प्रथम परवानगी घ्यावी, निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठलीही आमिषे दाखविली जाऊ नयेत. मतदार आणि कार्यकत्र्याच्या भोजनावळी किंवा ठराविक हॉटेल, ढाब्यांवर मद्यपाटर्य़ा होण्याची शक्यता गृहीत धरून अशा प्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे. 
निवडणुकी दरम्यान कुठल्याही व्यक्तीचा संशय आल्यास त्याची व त्याच्या वाहनाची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. 
बैठकीसाठी मनसेचे अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, गणोश प:हाड, मनोज खराबी, कॉँग्रेसचे कालिदास वाडेकर, भास्कर तुळवे, भाजपाचे अमृत शेवकरी, दिलीप वाळके, राष्ट्रवादीचे भगवान मेदनकर, राहुल नायकवाडी, आरपीआयचे संतोष जाधव, नितीन जगताप, राहुल गोतारणो, आदींसह पोलीस अधिकारी किशोर पाटील, खेडकर, मुंढे, प्रविणकुमार गोसावी व कमर्चारी उपस्थित होते.
(वार्ताहर)
 
4आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना पोलिसांनी काय करू नये. हे स्पष्ट केले. त्यामध्ये देऊळ, मशीद, चर्च आदी प्रार्थना स्थळांचा प्रचारासाठी वापर करू नये, मतदारांना लाच अथवा धाक दाखवू नये. मतदान केंद्रापासून 1क्क् मीटरच्या आत प्रचार करू नये, मतदारांची ने-आन करण्यासाठी वाहन वापरू नये, खाजगी इमारतींवर पोस्टर्स घोषणा लिहू नये, अन्य पक्षांच्या सभांमध्ये अडथळा आणू नये. अन्य सभांच्या ठिकाणी मिरवणुका आणू नयेत, वैयक्तिक व टोकाच्या टीका टिपण्या करू नयेत, घातक शस्त्न बाळगू नयेत, अशा अनेक सूचना करण्यात आलेल्या असून त्याचे काटेकोर पालन करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.