शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

शिवरायांसारखे आदर्श चरित्र निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:26 IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे जगभरात कौतुक केले जाते. समाजातील अनेक व्यक्ती, तरुण शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांचे कार्य, ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे जगभरात कौतुक केले जाते. समाजातील अनेक व्यक्ती, तरुण शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. त्यांचे कार्य, राजकारण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था याची माहिती घेतात. पण आपल्या वागणुकीत त्या गोष्टी आणत नाहीत. सद्यस्थितीत बेरोजगारी, महागाई यामुळे तरुण पिढीत नैराश्य वाढत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

पांडुरंग बलकवडे म्हणाले,

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून देशभक्तीची प्रेरणा घ्यावी. आपण एखाद्या उद्योगात किंवा व्यवसायात कशाप्रकारे यशस्वी होऊ शकतो. यासाठी महाराजांच्या व्यवस्थेचा अभ्यास करावा. अन्याय करणाऱ्या लोकांशी संघर्ष करण्याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हावी. यासाठी शिवाजी महाराजांनी भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण केला. आताच्या समाजाला भ्रष्टाचारमुक्त होण्याची गरज आहे.

तरुणांनी व्यवसाय उभा करावा यासाठी बलकवडे यांनी असे उदाहरण दिले की,

शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना ३३ गावांचा कारभारी म्हणून पाठवले होते. महाराजांनी त्याची ३३०० पेक्षा जास्त गावे केली. त्यांच्या बरोबर ५० सेवक दिले होते. तर १६८० च्या काळात स्वराज्य स्थापनेच्या सेवेत ५ लाख सेवक कार्यरत होते. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना ५ हजारची पुंजी दिली होती. महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य खजिन्यात २ कोटी रुपये होते. आदर्श उद्योजकाची व्याख्या ग्राहकांचे हित, समाधान, पाहणे होय. त्याबरोबरच रयतेच्या सुखही पाहायला हवे. हा शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.

..................

तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अशक्यप्राय परिस्थितीवर मात करून पुढे जायला हवे. सध्या समाजात नकारात्मक विचार करणे वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे ठरवले होते. ते पूर्णही करून दाखवले. तरुणांनी सध्याचा काळ जरी वेगळा असला तरी ठरवलेल्या गोष्टी पूर्ण कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराज शिस्तप्रिय होते. त्याप्रमाणे तरुणांबरोबरच समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिस्त आणि नियमांचे पालन करायला हवे. सध्या त्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे.

प्रदीप रावत

अध्यक्ष

भारत इतिहास संशोधक मंडळ