शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

जातीविरहित समाजनिर्मिती व्हावी

By admin | Updated: May 5, 2017 03:07 IST

भारतावर मूठभर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विषवल्लीमुळे भारत कधीच एकसंध होऊ शकला

पुणे : भारतावर मूठभर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विषवल्लीमुळे भारत कधीच एकसंध होऊ शकला नाही. दुभंगलेपणामुळे भारत सर्वगुणसंपन्न असूनही गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होऊ शकला नाही. भारताला एकसंध ठेवायचे असेल, तर जातीविरहित समाजनिर्मितीकडे आपली वाटचाल होणे महत्त्वाचे आहे. अभिजन आणि बहुजन यांतील अंतर कमी होणे ही काळाची गरज आहे, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. पुण्यातील साई प्रतिष्ठान आणि विश्वशांती सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी फुटाणे बोलत होते. फुटाणे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. प्रमोद आडकर, अभिनेते शशिकांत खानविलकर उपस्थित होते. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी स्वागत केले.मिलिंद सुधाकर जोशी यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘अंत:प्रेरणेतून जे काम उभे राहते तेच चिरकाल टिकते. कोणत्याही कामासाठी माणसाला प्रेरणा आवश्यक असते. अंत:प्रेरणा हीच खरी प्रेरणा असून, अंत:प्रेरणेतून जे काम उभे राहते तेच चिरकाल टिकते. समाज हे गुणवत्तेचे उद्यान आहे, या गुणवत्तेचा शोध घेऊन सन्मान केला पाहिजे.’