शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जातीविरहित समाजनिर्मिती व्हावी

By admin | Updated: May 5, 2017 03:07 IST

भारतावर मूठभर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विषवल्लीमुळे भारत कधीच एकसंध होऊ शकला

पुणे : भारतावर मूठभर मुघलांनी आणि इंग्रजांनी राज्य केले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विषवल्लीमुळे भारत कधीच एकसंध होऊ शकला नाही. दुभंगलेपणामुळे भारत सर्वगुणसंपन्न असूनही गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होऊ शकला नाही. भारताला एकसंध ठेवायचे असेल, तर जातीविरहित समाजनिर्मितीकडे आपली वाटचाल होणे महत्त्वाचे आहे. अभिजन आणि बहुजन यांतील अंतर कमी होणे ही काळाची गरज आहे, असे मत वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. पुण्यातील साई प्रतिष्ठान आणि विश्वशांती सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी फुटाणे बोलत होते. फुटाणे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. प्रमोद आडकर, अभिनेते शशिकांत खानविलकर उपस्थित होते. साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय चौधरी यांनी स्वागत केले.मिलिंद सुधाकर जोशी यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘अंत:प्रेरणेतून जे काम उभे राहते तेच चिरकाल टिकते. कोणत्याही कामासाठी माणसाला प्रेरणा आवश्यक असते. अंत:प्रेरणा हीच खरी प्रेरणा असून, अंत:प्रेरणेतून जे काम उभे राहते तेच चिरकाल टिकते. समाज हे गुणवत्तेचे उद्यान आहे, या गुणवत्तेचा शोध घेऊन सन्मान केला पाहिजे.’