शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

................... मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; हवेली, खेड, मुळशी, पुरंदर प्रांताधिकाऱ्यांची जमीन विवाद सुनावणीत दिरंगाई लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ...

...................

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; हवेली, खेड, मुळशी, पुरंदर प्रांताधिकाऱ्यांची जमीन विवाद सुनावणीत दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ-मुळशी, खेड आणि पुरंदर- दौंडच्या प्रांताधिकाऱ्यांनी जमीनविषयक दावे दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आठ आठवड्यांत अन्य अधिकाऱ्यांकडे वर्ग करावीत, असेही नमूद केले आहे. या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यात पडणार आहेत.

न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

जमीनविषयक वादविवाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत कलम २५५ आणि २५७ नुसार अपील, पुनर्विलोकन अर्ज, पुनरीक्षण अर्ज हे प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केली जातात. मात्र, वर्षानुवर्षे निकाल दिला जात नसल्याच्या तक्रारी आल्याने या कलमामध्ये, २०१६ साली राज्य सरकारने सुधारणा करून अशी अपिले एक वर्षाच्या आत निकाली काढावीत. अपवादात्मक परिस्थितीत सहा महिने मुदतवाढ देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारच्या या आदेशाचेही मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.

या पार्श्वभूमीवर, पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, प्रलंबित ३ हजार ५० प्रकरणे अन्य सक्षम अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचा आदेश हवेली, मावळ-मुळशी-खेड आणि दौंड-पुरंदर या प्रांताधिकाऱ्यांना फेब्रुवारी २०२० मध्ये दिला. मात्र, चारही प्रांताधिकाऱ्यांनी तो आदेश जुमानला नाही.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. क्रांती सहाणे आणि ʻप्रॉपर्टी प्रोटेक्टरʼ या संस्थेचे अमिन शेख यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून अपील वर्ग करण्याची मागणी केली. तसेच मुदतीनंतर दिलेले निकाल रद्द करावेत आणि विलंब करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशीही मागणी केली. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर, याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती अधिकारांतर्गत प्राप्त केली. त्या माहितीच्या आधारे, सहाणे आणि शेख यांनी २८ जुलै २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली.

त्यात, जमीनविषयक दावे राज्य सरकारच्या आदेशानुसार वर्ग करावीत, शिस्तभंग करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, तसेच त्यांच्या नेमणुका अकार्यकारी पदावर कराव्यात, अशी मागणी केली.

त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांनी तीन आठवड्यात सुनावणी घेत निकाल दिला. त्यात आठ आठवड्यांत प्रलंबित दावे वर्ग करण्याचे तसेच या विलंबाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

....................................

चौकट

उपविभागीय वर्गीकरणाची

अधिकारी प्रकरणे

१ हवेली ६००

२ मावळ मुळशी १०००

३ पुरंदर, दौंड ८५०

४ खेड ६००