शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:15 IST

................... मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; हवेली, खेड, मुळशी, पुरंदर प्रांताधिकाऱ्यांची जमीन विवाद सुनावणीत दिरंगाई लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ...

...................

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; हवेली, खेड, मुळशी, पुरंदर प्रांताधिकाऱ्यांची जमीन विवाद सुनावणीत दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली, मावळ-मुळशी, खेड आणि पुरंदर- दौंडच्या प्रांताधिकाऱ्यांनी जमीनविषयक दावे दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच ही प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आठ आठवड्यांत अन्य अधिकाऱ्यांकडे वर्ग करावीत, असेही नमूद केले आहे. या निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यात पडणार आहेत.

न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.

जमीनविषयक वादविवाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत कलम २५५ आणि २५७ नुसार अपील, पुनर्विलोकन अर्ज, पुनरीक्षण अर्ज हे प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केली जातात. मात्र, वर्षानुवर्षे निकाल दिला जात नसल्याच्या तक्रारी आल्याने या कलमामध्ये, २०१६ साली राज्य सरकारने सुधारणा करून अशी अपिले एक वर्षाच्या आत निकाली काढावीत. अपवादात्मक परिस्थितीत सहा महिने मुदतवाढ देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारच्या या आदेशाचेही मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.

या पार्श्वभूमीवर, पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, प्रलंबित ३ हजार ५० प्रकरणे अन्य सक्षम अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचा आदेश हवेली, मावळ-मुळशी-खेड आणि दौंड-पुरंदर या प्रांताधिकाऱ्यांना फेब्रुवारी २०२० मध्ये दिला. मात्र, चारही प्रांताधिकाऱ्यांनी तो आदेश जुमानला नाही.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. क्रांती सहाणे आणि ʻप्रॉपर्टी प्रोटेक्टरʼ या संस्थेचे अमिन शेख यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून अपील वर्ग करण्याची मागणी केली. तसेच मुदतीनंतर दिलेले निकाल रद्द करावेत आणि विलंब करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशीही मागणी केली. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर, याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती अधिकारांतर्गत प्राप्त केली. त्या माहितीच्या आधारे, सहाणे आणि शेख यांनी २८ जुलै २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली.

त्यात, जमीनविषयक दावे राज्य सरकारच्या आदेशानुसार वर्ग करावीत, शिस्तभंग करणाऱ्या प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, तसेच त्यांच्या नेमणुका अकार्यकारी पदावर कराव्यात, अशी मागणी केली.

त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांनी तीन आठवड्यात सुनावणी घेत निकाल दिला. त्यात आठ आठवड्यांत प्रलंबित दावे वर्ग करण्याचे तसेच या विलंबाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

....................................

चौकट

उपविभागीय वर्गीकरणाची

अधिकारी प्रकरणे

१ हवेली ६००

२ मावळ मुळशी १०००

३ पुरंदर, दौंड ८५०

४ खेड ६००