शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

परस्पर संमतीने पती-पत्नीला मिळाला २३ दिवसांत घटस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समीर आणि रूपाली (नावे बदललेली) यांच्या लग्नाला २४ वर्षे झाली. त्यांना २२ वर्षांचा मुलगा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समीर आणि रूपाली (नावे बदललेली) यांच्या लग्नाला २४ वर्षे झाली. त्यांना २२ वर्षांचा मुलगा आणि २० वर्षांची मुलगी आहे. इतक्या वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि आता एकत्र नांदता येणे शक्य नसल्याने दोघांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. केवळ २३ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. कौटुंबिक न्यायाधीश एच. के. गणात्रा यांनी हा निर्णय दिला.

परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज दाखल करताना पती-पत्नी हे एक वर्ष विभक्त राहिले पाहिजेत, तसेच अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी सहा महिने थांबणे बंधनकारक आहे. मात्र, हा सहा महिन्यांचा ‘वेटिंग’ कालावधी माफ करायचा असेल, तर तसे सबळ कारण न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे लागते, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवाड्याचा आधार घेत कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा सहा महिने प्रलंबित ठेवणे शक्य नसल्याचा युक्तिवाद घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या वतीने अॅड. सागर भोसले यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला.

समीर आणि रूपाली यांनी घटस्फोट घेण्याआधी नातेवाईकांसोबत चर्चा करून पोटगी, मुलांचा ताबा व अन्य मुद्द्यांबाबत अटी-शर्ती ठरवून घेतल्या. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने २३ जुलैला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. न्यायालयाने हा अर्ज १६ आॅगस्ट रोजी मंजूर केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार, परस्पर संमतीने घटस्फोट अर्जामध्ये सहा महिने वेटिंग कालावधी माफ करण्यासाठी, अर्जदार हे एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ विभक्त राहिले पाहिजेत. भविष्यामध्ये ते दोघे एकत्र राहू शकत नाहीत. अर्जदारांमधील मतभेद किंवा वाद हे मध्यस्थ, नातेवाईक यांच्यामार्फत मिटवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. अर्जदारांनी पोटगी, मुलांचा ताबा व इतर प्रलंबित मुद्द्यांबाबतच्या अटी ठरवलेल्या पाहिजे, तसेच सहा महिने वेटिंग कालावधी माफ करण्यासाठी सबळ कारण असले पाहिजे, असे अर्जदारांचे वकील अॅड. सागर भोसले यांनी सांगितले.