शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

मतमोजणी संथ गतीने

By admin | Updated: April 5, 2015 00:53 IST

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली.

पिंपरी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली. त्यामुळे आपले राजकीय भवितव्य काय राहणार, याची उकल होण्यासाठी भावी कारभाऱ्यांना शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली.कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी मुळशी तालुक्यातील कासारआंबोली गावातील मुलींच्या सैनिकी शाळेतील सभागृहात झाली. त्यासाठी निवडणूक विभागाने ३२ टेबलवर मोजणीची व्यवस्था केली. सकाळी ८पासूनच मतमोजणीला सुरुवात होणार होती. त्या कामी दीडशे कर्मचारी साडेसहापासूनच हजर राहिले. सकाळी सात वाजल्यापासून उमेदवारांचे मतदार प्रतिनिधी आणि समर्थक मतदान केंद्रावर, तसेच केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होण्यास अडीच तास उशीर होत, ती सकाळी साडेदहाला सुरू झाली. पहिल्या फेरीमध्ये २१ टेबलवरील, त्यामध्ये मावळ, मुळशी तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात झाली. एकेक मतपत्रिका काढून त्यामधील मताची नोंद केली जात होती. या वेळी आतमध्ये उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकेका मतदानावर बारकाईने लक्ष देत होते. दुपारी साडेबारानंतर एकेका मतदारसंघातील व गटातील मतमोजणी मुख्य निवडणूक अधिकारी सुभाष बोरकर यांनी ध्वनिक्षेपकावर जाहीर करण्यास सुरुवात केली. या वेळी प्रशांत ढगे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. मुख्य फाटकावरच प्रत्येकाची कसून चौकशी केली गेली. ज्यांचा या प्रक्रियेशी थेट संबंध नाही, अशांना तेथेच रोखण्यात आले. मतमोजणी स्थळीही उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांची लुडबूड होणार नाही, याची खबरदारी घेत पोलिसांची करडी नजर बंदोबस्तावर राहिली. अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)समर्थक पोळले उन्हात४मतदान केंद्राबाहेर अनेक समर्थकांना पाचशे मीटरवर असलेल्या फाटकावरच रोखण्यात आले होते. जवळ फारशी झाडे व बांधकामे नसल्याने त्यांना बसण्यासाठी सावलीअभावी उन्हातच ताटकळत थांबण्याची वेळ आली. त्यामुळे समर्थक कार्यकर्तेही नाराज झाले.४एकीकडे मतदारांचे प्रमाण व उमेदवारांची संख्या अधिक असताना मतपत्रिका मोजण्यास किती वेळ लागेल, याचा अंदाज लांबत चालल्याचे दिसून आले. कामाच्या व्यापामुळे अनेक निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवण करण्यासही फुरसत मिळाली नाही. बहुतेक जणांचे काम उपाशीपोटीच सायंकाळी सातपर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत केवळ पाणी पिऊन जबाबदारी पार पाडण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. नियोजन नसल्याबद्दल काहीजणांनी नाराजी व्यक्त केली.