शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मतमोजणी संथ गतीने

By admin | Updated: April 5, 2015 00:53 IST

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली.

पिंपरी : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया कासवगतीने सुरू राहिल्याने एकेका मतदारसंघाचे निकाल हाती येण्याची वाट पाहण्याची वेळ सर्वांवरच आली. त्यामुळे आपले राजकीय भवितव्य काय राहणार, याची उकल होण्यासाठी भावी कारभाऱ्यांना शनिवारी रात्री उशिरापर्यंत ताटकळत बसण्याची वेळ आली.कारखान्याच्या २१ जागांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मोजणी शनिवारी मुळशी तालुक्यातील कासारआंबोली गावातील मुलींच्या सैनिकी शाळेतील सभागृहात झाली. त्यासाठी निवडणूक विभागाने ३२ टेबलवर मोजणीची व्यवस्था केली. सकाळी ८पासूनच मतमोजणीला सुरुवात होणार होती. त्या कामी दीडशे कर्मचारी साडेसहापासूनच हजर राहिले. सकाळी सात वाजल्यापासून उमेदवारांचे मतदार प्रतिनिधी आणि समर्थक मतदान केंद्रावर, तसेच केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमले होते. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होण्यास अडीच तास उशीर होत, ती सकाळी साडेदहाला सुरू झाली. पहिल्या फेरीमध्ये २१ टेबलवरील, त्यामध्ये मावळ, मुळशी तालुक्यातील मतमोजणीला सुरुवात झाली. एकेक मतपत्रिका काढून त्यामधील मताची नोंद केली जात होती. या वेळी आतमध्ये उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी एकेका मतदानावर बारकाईने लक्ष देत होते. दुपारी साडेबारानंतर एकेका मतदारसंघातील व गटातील मतमोजणी मुख्य निवडणूक अधिकारी सुभाष बोरकर यांनी ध्वनिक्षेपकावर जाहीर करण्यास सुरुवात केली. या वेळी प्रशांत ढगे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित होते. मुख्य फाटकावरच प्रत्येकाची कसून चौकशी केली गेली. ज्यांचा या प्रक्रियेशी थेट संबंध नाही, अशांना तेथेच रोखण्यात आले. मतमोजणी स्थळीही उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांची लुडबूड होणार नाही, याची खबरदारी घेत पोलिसांची करडी नजर बंदोबस्तावर राहिली. अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)समर्थक पोळले उन्हात४मतदान केंद्राबाहेर अनेक समर्थकांना पाचशे मीटरवर असलेल्या फाटकावरच रोखण्यात आले होते. जवळ फारशी झाडे व बांधकामे नसल्याने त्यांना बसण्यासाठी सावलीअभावी उन्हातच ताटकळत थांबण्याची वेळ आली. त्यामुळे समर्थक कार्यकर्तेही नाराज झाले.४एकीकडे मतदारांचे प्रमाण व उमेदवारांची संख्या अधिक असताना मतपत्रिका मोजण्यास किती वेळ लागेल, याचा अंदाज लांबत चालल्याचे दिसून आले. कामाच्या व्यापामुळे अनेक निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना जेवण करण्यासही फुरसत मिळाली नाही. बहुतेक जणांचे काम उपाशीपोटीच सायंकाळी सातपर्यंत सुरू होते. रात्री उशिरापर्यंत केवळ पाणी पिऊन जबाबदारी पार पाडण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. नियोजन नसल्याबद्दल काहीजणांनी नाराजी व्यक्त केली.