शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

खर्च २० हजारांचा, वसुली १६ हजार

By admin | Updated: December 11, 2015 01:03 IST

लाखो प्रवाशांची दररोज ने-आण करणाऱ्या पीएमपीमध्ये दिवसाला सरासरी १६० प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यांच्याकडून दररोज १६ हजारांचा दंड वसूल केला जातो;

पुणे : लाखो प्रवाशांची दररोज ने-आण करणाऱ्या पीएमपीमध्ये दिवसाला सरासरी १६० प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. त्यांच्याकडून दररोज १६ हजारांचा दंड वसूल केला जातो; मात्र या वसुलीसाठी नेमण्यात आलेल्या पथकाचा खर्चच दरदिवशी जवळपास २० हजार रुपये असल्याचे तथ्य समोर आले आहे. त्यामुळे या पथकाच्या गेल्या सहा महिन्यांतील कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पीएमपीतून दररोज लाखो प्रवासी शहरात ये-जा करतात. यात पासधारक; तसेच तात्पुरत्या प्रवासासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांच्या तुलनेत पीएमपी बसची संख्या कमी असल्याने जवळपास सर्वच बस सकाळी आणि सायंकाळी गर्दीने भरलेल्या असतात, नेमका याचाच फायदा घेत शेकडो प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. त्यात प्रामुख्याने दरवाजाला लटकून एका स्टॉपवरून दुसऱ्या स्टॉपपर्यंत, तर अनेकदा गर्दीत उतरण्याच्या दरवाजात पुढे जाऊन वाहक जवळ येताच खाली उतरणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पीएमपीकडून नेमण्यात आलेल्या तपासणी पथकांनी गेल्या आठ महिन्यांत सुमारे ३९ हजार २०० प्रवाशांवर कारवाई करून ३९ लाख २ हजार ७०० रुपयांची वसुली केलेली आहे. पथकांकडून विना- तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १०० रुपये, तर पासचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशाकडून १५० रुपयांचा दंड वसूल केला जातो.> पथकावर २० हजार खर्च तिकीट तपासणीसाठी प्रशासनाकडून ८ पथके नेमण्यात आलेली आहे. या प्रत्येक पथकात सुमारे ४ कर्मचारी असतात. या कर्मचाऱ्यांचे सरासरी दरदिवशीचे वेतन आणि त्यांना दिला जाणारा प्रवास खर्च; तसेच इतर भत्ते पाहता, या पथकाचा प्रतिदिन खर्च जवळपास २० ते २२ हजार रुपयांचा आहे. त्यामुळे या पथकांकडून अपेक्षित काम होत नाही.