शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

श्रेय लाटण्यासाठीच नगरसेवकाची ‘स्टंटबाजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचे सांगत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खराडी गावातील स्मशानभूमीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याचे सांगत नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी चितेवर झोपून आंदोलन केले. हे आंदोलन केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी करण्यात आले. आता काम पूर्णत्वास आल्याची माहिती झाल्यानंतर चितेवर झोपून जाधव ‘स्टंटबाजी’ करत असल्याचा आरोप खराडीतील काही नागरिकांनी केला आहे.

जाधव यांनी आंदोलन केल्यानंतर दोन दिवसांनी लगेच त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा अर्थ काम पूर्ण होत आल्याची माहिती जाधव यांना होती. गेल्या १० वर्षांपासून सुस्थितीत असलेल्या स्मशानभूमीचे नूतनीकरण का करण्यात येत आहे, बजेट मिळणार नव्हते तर नूतनीकरणाचा घाट का घातला, नगरसेवक म्हणून दरवर्षी मिळणाऱ्या अडीच कोटींच्या निधीचे काय झाले, स्वतःच्या वाॅर्डस्तरीय योजनेतून या कामासाठी पैसे का टाकले नाहीत, असे अनेक प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केले आहेत.

नगरसेवक जाधव यांनी मिळालेला विकास निधी स्मशानभूमीसाठी खर्च केला असता तर चितेवर झोपण्याची स्टंटबाजी त्यांना करावी लागली नसती. गेल्या चार वर्षांत किती निधी कुठे खर्च केला, प्रभागात कुठे, कोणती कामे सुरू आहेत, त्यासाठी किती निधी मंजूर आहे याची माहिती त्यांनी जनतेला द्यावी. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच नागरिकांना रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली असा आरोप स्थानिक करत आहेत.

कोट

“खर्चाची माहिती आयुक्तांना विचारावी. आंदोलन केले म्हणून तरी तत्काळ तीन ब्लॉक सुरू झाले. स्मशानभूमीला आधी पत्र्याचे छत होते. अंत्यसंस्कार करताना उपस्थितांना त्रास होऊ नये यासाठी नूतनीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते, त्यावेळी विरोधक कुठे होते. त्यांनी चितेवर झोपून आंदोलन करून दाखवावे.”

-भैयासाहेब जाधव, नगरसेवक