शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आदरांजली योजनेवरही कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:10 IST

पुणे : सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ...

पुणे : सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या आदरांजली योजनेवरही कोरोनाचे सावट आहे. या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातूनच प्रत्येकी ५० रुपये घेतले जातात. पण लॉकडाऊन काळात ही कपात न झाल्याने या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनी ही मदत मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या वारसदारांसाठी आदरांजली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत स्वेच्छेने सुमारे ८ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रत्येक कर्मचाºयाच्या दर महिन्याच्या वेतनातून योजनेसाठी ५० रुपये कपात करणे अपेक्षित होते.

ही रक्कम निधन झालेले कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसदारांना दिली जाणार आहे. पण लॉकडाऊनमुळे पीएमपीची बससेवा ठप्प होती. अनेक कर्मचाऱ्यांना वेतनही मिळाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कपात करण्यात आली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या वेतनापासून ही कपात केली जाणार आहे. याबाबतचे परिपत्रक कामगार अधिकारी सतिश गाटे यांनी काढले आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात चार कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून २०० रुपये कपात केली जाणार आहे.

फेब्रुवारी ते नोव्हेंबर या कालावधीतही काही कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. या कर्मचाऱ्यांना आदरांजली योजनेचा लाभ मिळणार की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या कालावधीत अनेक कर्मचाºयांना पुर्ण वेतन मिळाले नाही, अनेकांना कामही नव्हते. त्यामुळे ५० रुपये कपात करता आले नाहीत. त्यामुळे या कालावधीत निधन झालेल्या कर्मचाºयांना योजनेचा लाभ देण्याबाबत संभ्रम आहे. गाटे यांनीही याला दुजोरा दिला. लॉकडाऊन काळात काही कर्मचाºयांचे निधन झाले आहे. त्यांनाही योजनेचा लाभ द्यायचा झाल्यास कर्मचाºयांच्या वेतनातून मोठी रक्कम कपात करावी लागेल. त्यामुळे याबाबत अद्याप स्पष्टता नाही, असे गाटे यांनी सांगितले.

-----------