शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ओसरल्याने गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या आपल्या ...

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या आपल्या मूळ राज्यात कामगार गेले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे ते आता परत येऊ लागले आहेत. विशेषत: पुणे, मुंबईकडे कामगारांचा ओघ पुन्हा वाढू लागला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बध लागू केले होते. त्यामुळे हजारो कामगार, छोठे-मोठे व्यावसायिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आपापल्या गावी गेले होते.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हे गेलेले नागरिक पुन्हा कामाच्या ठिकाणी परत येऊ लागले आहेत.

----

परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी गेले

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून परदेशात शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, फिलिपिन्स आदी देशांत प्रामुख्याने महाराष्ट्रातून विद्यार्थी गेले आहेत. जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या-त्यांच्या जिल्हा, शहर प्रशासनाच्यावतीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.

-----

सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांतून कामगारांचे स्थलांतर पुन्हा होऊ लागले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील मुंबई शहराकडे सर्वांत जास्त स्थलांतर होत आहे. त्याखालोखाल पुणे, नंतर नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांत मोठ्या संख्येने कामगार पुन्हा परतू लागले आहे.

-----

मुले देश-परदेशात; चिंता पालकांची

कोट

मी मूळचा साताऱ्याचा आहे. माझी नोकरी मुंबईत आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी साताऱ्याला गेलो आणि तिथूनच जवळपास यंदाच्या मार्चपर्यंत काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंपनीने कामावर परत येण्यास सांगितले आहे. एप्रिलमध्ये मुंबईत परतलो. कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो गेलेला नाही. त्यामुळे कुटुंब थोडं काळजीत आहे. पण काम तर करावेच लागेल ना?

- सचिन रास्ते, नोकरदार

----

कोट

माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेतील एका कंपनीत चांगल्या पदावर काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पाश्चात्त्य देशापासून सुरुवात झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत होती. याचदरम्यान, आम्ही यंदाच्या वर्षी अमेरिकेची वारी करून आलो. तब्बल पाच महिने त्याच्याकडे राहिलो. तो ज्या ठिकाणी राहतो तिथे कोरोना पूर्णत: नियंत्रणात आहे. लोकं फारशी घराबाहेर पडत नाहीत. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही सुखरूप मनाने भारतात परतलो. तरीही आईचं काळीज आहे. त्यामुळे मुलगा लांब आहे म्हटल्यावर काळजी राहणारचं.

- रमा चरणकर, गृहिणी