शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

कोरोना ओसरल्याने गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या आपल्या ...

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या आपल्या मूळ राज्यात कामगार गेले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे ते आता परत येऊ लागले आहेत. विशेषत: पुणे, मुंबईकडे कामगारांचा ओघ पुन्हा वाढू लागला आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने महाराष्ट्रात कठोर निर्बध लागू केले होते. त्यामुळे हजारो कामगार, छोठे-मोठे व्यावसायिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आपापल्या गावी गेले होते.

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हे गेलेले नागरिक पुन्हा कामाच्या ठिकाणी परत येऊ लागले आहेत.

----

परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी गेले

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून परदेशात शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, फिलिपिन्स आदी देशांत प्रामुख्याने महाराष्ट्रातून विद्यार्थी गेले आहेत. जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या-त्यांच्या जिल्हा, शहर प्रशासनाच्यावतीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.

-----

सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे

उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल या राज्यांतून कामगारांचे स्थलांतर पुन्हा होऊ लागले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील मुंबई शहराकडे सर्वांत जास्त स्थलांतर होत आहे. त्याखालोखाल पुणे, नंतर नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांत मोठ्या संख्येने कामगार पुन्हा परतू लागले आहे.

-----

मुले देश-परदेशात; चिंता पालकांची

कोट

मी मूळचा साताऱ्याचा आहे. माझी नोकरी मुंबईत आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात कंपनीने ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी साताऱ्याला गेलो आणि तिथूनच जवळपास यंदाच्या मार्चपर्यंत काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंपनीने कामावर परत येण्यास सांगितले आहे. एप्रिलमध्ये मुंबईत परतलो. कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो गेलेला नाही. त्यामुळे कुटुंब थोडं काळजीत आहे. पण काम तर करावेच लागेल ना?

- सचिन रास्ते, नोकरदार

----

कोट

माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेतील एका कंपनीत चांगल्या पदावर काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पाश्चात्त्य देशापासून सुरुवात झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत होती. याचदरम्यान, आम्ही यंदाच्या वर्षी अमेरिकेची वारी करून आलो. तब्बल पाच महिने त्याच्याकडे राहिलो. तो ज्या ठिकाणी राहतो तिथे कोरोना पूर्णत: नियंत्रणात आहे. लोकं फारशी घराबाहेर पडत नाहीत. हे सर्व पाहिल्यानंतर आम्ही सुखरूप मनाने भारतात परतलो. तरीही आईचं काळीज आहे. त्यामुळे मुलगा लांब आहे म्हटल्यावर काळजी राहणारचं.

- रमा चरणकर, गृहिणी