शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनाने दीड हजार बालकांनी गमावले पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ६२० बालकांची आतापर्यंत नोंद झाली आहे. या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ६२० बालकांची आतापर्यंत नोंद झाली आहे. या बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, शिक्षण विभागाने पूर्ण खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतिदलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे अनेक बालकांनी दोन्ही पालकत्व गमावले आहे. अशी बालके शिक्षणापासून वंचित राहू नये, याची शिक्षणाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. यासाठी तालुकास्तरावर बालकांची माहिती संकलित करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. त्याचबरोबर या बालकांचे समुपदेशन करून शासकीस मदत मिळण्यासाठी त्यांचे घराजवळीत बँकेत खाते उघडण्यात यावे. यासंदर्भात काही अडचणी असल्यास जिल्हा कार्यालयाकडून संबंधित बँक अधिकाऱ्यांना सूचना द्यावा. याशिवाय या बालकांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधवा महिलांना आधार

कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही करावी. याशिवाय दोन्ही पालकत्व गमावलेल्या बालकांची नावे त्याचप्रमाणे एक पालक कोरोनाने दगावल्याने संरक्षणाची गरज असलेले बालक व विधवा झालेल्या महिलांची नोंद वारसदार म्हणून लावण्यासाठी संबंधित शाखेमार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

दहा वर्षांखालील ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत, अशा बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रतिपालकत्व करणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हा न्यायालयामार्फत प्रक्रिया करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर बालकांना त्यांचा वारसा हक्क मिळवून देण्याबाबतही तहसीलदारांना आदेश दिले आहेत.

-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी