शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना संसर्ग उरुळी कांचन परिसराची पाठ सोडेना, पाच दिवसांत ५६ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST

उरुळी कांचन हे हवेली तालुक्यातील पूर्व भागातील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव असून या गावांमध्ये परिसरातून सुमारे पंधरा गावांचे ...

उरुळी कांचन हे हवेली तालुक्यातील पूर्व भागातील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव असून या गावांमध्ये परिसरातून सुमारे पंधरा गावांचे नागरिक तसेच नऊ - दहा वाड्या वस्त्यांवरील नागरिक आपल्या गरजा भागवण्यासाठी व या ठिकाणाहून अन्यत्र जाण्या - येण्यासाठी येत असतात, तसेच शेतकरी वर्ग आपल्या शेतातील उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उरुळी कांचन मध्ये घेऊन येत असतो, तो खरेदी करण्यासाठी अगदी लोणावळा ते दौंड पासूनचे व्यापारी उरुळी कांचन परिसरात येत असतात, मात्र या व्यापारी व शेतकरी वर्गाकडून प्रतिबंधासाठी लागू केलेले नियम व निर्बंध पाळण्याऐवजी पायदळी तुडवण्याची स्पर्धा लागली की काय असे वातावरण दिसून येत आहे रविवार आठवडा बाजाराचा दिवस मात्र या बाजारात व्यापारी अथवा ग्राहक कोणत्याही प्रकारे कोरोना प्रतिबंधासाठीचे सामाजिक अंतर, मास्क उपाय व नियम पाळत नसल्याचेच दिसून आले आहे. यापुढील काळात उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून कोरोना प्रतिबंध टाळण्यासाठी नियमांचे पालन न झाल्यास त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून उरुळीकांचन मध्ये आजपर्यंत १३५६ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ११९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर आजमितीला १२७ रुग्ण ॲक्टिव्ह असून सुमारे ३४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात प्रतिबंधक उपाय पायदळी तुडवल्याचे चित्र.