शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आणले गोर-गरिबांच्या शिक्षणावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:11 IST

राहूल शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आले आहे. राेजीरोटीसाठी शहरात यावे लागल्याने ...

राहूल शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आले आहे. राेजीरोटीसाठी शहरात यावे लागल्याने राज्यातील शालाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्येच ही संख्या जास्त असल्याचेही आढळून आले आहे.

शालेय शिक्षण विभागाने शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांसाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात २५ हजार २०४ इतके विद्यार्थी शालाबाह्य आढळून आले. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने ही नुकतीच सादर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात ही मोहीम राबवता आली नाही. पिंपरी चिंचवड मनपा व नागपूर मनपा क्षेत्रातही ही मोहीम सुरू करता आली नाही.

कसे होते बालकांचे स्थलांतर ?

साधारणत: सप्टेंबरनंतर ही कुटुंबे, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या जवळच्या राज्यात स्थलांतर करतात. मोठ्या प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहमदनगर येथे तर शेजारी असणाऱ्या कर्नाटक व गुजरात येथे स्थलांतर करतात. अनेक कुटुंबे वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे करण्यासाठी स्थलांतर करीत असतात.

-------------

कशी राबवली शोध मोहीम ?

कोरोना काळातही पर्यवेक्षीय अधिकारी, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शालाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला. प्रत्येक गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळ घर, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवर/ रेल्वेमध्ये फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंताची वस्ती, विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्यास असलेल्या पालकांची बालके, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती घेण्यात आली.

--------------

राज्यातील सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी मोठ्या शहरांमध्येच

मुंबई उपनगर - १० हजार १७७, पालघर - २ हजार २८५, पुणे - ३ हजार २७८, अहमदनगर - ४६३, नाशिक- १ हजार ८६७, नंदुरबार- १ हजार ३१६, जळगाव- ७१८, बीड- ३२२, नांदेड - १६०, अकोला- १ हजार ६४, चंद्रपूर - १०७, गडचिरोली- २७७,वर्धा - १७७.