शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
4
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
5
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
6
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
7
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
8
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
9
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
10
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
11
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
12
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
13
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
14
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
15
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
16
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
17
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
18
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
19
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

कोरोनाने आणले गोर-गरिबांच्या शिक्षणावर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:11 IST

राहूल शिंदे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आले आहे. राेजीरोटीसाठी शहरात यावे लागल्याने ...

राहूल शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर गंडांतर आले आहे. राेजीरोटीसाठी शहरात यावे लागल्याने राज्यातील शालाबाह्य मुलांची संख्या वाढली आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्येच ही संख्या जास्त असल्याचेही आढळून आले आहे.

शालेय शिक्षण विभागाने शालाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांसाठी १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. त्यात २५ हजार २०४ इतके विद्यार्थी शालाबाह्य आढळून आले. प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने ही नुकतीच सादर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात ही मोहीम राबवता आली नाही. पिंपरी चिंचवड मनपा व नागपूर मनपा क्षेत्रातही ही मोहीम सुरू करता आली नाही.

कसे होते बालकांचे स्थलांतर ?

साधारणत: सप्टेंबरनंतर ही कुटुंबे, महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या जवळच्या राज्यात स्थलांतर करतात. मोठ्या प्रमाणात कुटुंबे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहमदनगर येथे तर शेजारी असणाऱ्या कर्नाटक व गुजरात येथे स्थलांतर करतात. अनेक कुटुंबे वीटभट्टी, दगडखाण, कोळसाखाणी, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे करण्यासाठी स्थलांतर करीत असतात.

-------------

कशी राबवली शोध मोहीम ?

कोरोना काळातही पर्यवेक्षीय अधिकारी, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व इतर शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शालाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेतला. प्रत्येक गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वेस्टेशन, बसस्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गुऱ्हाळ घर, गावाबाहेरची पालं, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे या ठिकाणी भेटी दिल्या. तसेच स्थलांतरित कुटुंबे, झोपड्या, फुटपाथ, सिग्नलवर/ रेल्वेमध्ये फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, लोककलावंताची वस्ती, विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, शेतमळ्यांवरील आणि जंगलातील वास्तव्यास असलेल्या पालकांची बालके, मागास, वंचित गटातील व अल्पसंख्यांक गटातील वस्तीतील मुले यांची माहिती घेण्यात आली.

--------------

राज्यातील सर्वाधिक शाळाबाह्य विद्यार्थी मोठ्या शहरांमध्येच

मुंबई उपनगर - १० हजार १७७, पालघर - २ हजार २८५, पुणे - ३ हजार २७८, अहमदनगर - ४६३, नाशिक- १ हजार ८६७, नंदुरबार- १ हजार ३१६, जळगाव- ७१८, बीड- ३२२, नांदेड - १६०, अकोला- १ हजार ६४, चंद्रपूर - १०७, गडचिरोली- २७७,वर्धा - १७७.