शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

देशात आजही भय, लोभाद्वारे धर्मांतरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

पुणे : समरस असलेला समाजच संघटित होऊ शकतो. अस्पृश्यता, भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही. समरसता केवळ भाषणापुरती ...

पुणे : समरस असलेला समाजच संघटित होऊ शकतो. अस्पृश्यता, भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही. समरसता केवळ भाषणापुरती नव्हे तर जीवनात आचरण करण्याची गोष्ट आहे. देशात आजही भय, लोभाद्वारे धर्मांतरण सुरू असून ही गंभीर समस्या असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले.

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्यावतीने (महाराष्ट्र प्रांत) देण्यात येणाऱ्या २६ व्या श्री गोळवलकर गुरुजी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्यासह पुरस्कारार्थी हिंदू मुन्नाणी संघटनेचे के. सुब्रह्मण्यम आणि वास्तुशिल्पकार चंद्रकांत सोमपुरा यांचे पुत्र निखिल सोमपुरा उपस्थित होते. यावेळी सोमपुरा यांना कला क्षेत्रासाठी साताळकर यांच्या हस्ते तर के. सुब्रह्मण्यम यांना हिरेमठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी हिरेमठ म्हणाले, पवित्रता, उदात्तता आणि विशालता ही मंदिरांची वैशिष्ट्ये आहेत. मंदिरांमधून घडणारा हा संस्कार आहे. आपल्या पूर्वजांच्या श्रेष्ठ संस्कृती, जीवनमूल्य आणि संस्कारातून राष्ट्र व समाजाची निर्मिती झालेली आहे. यापुढे समाजाला जागरूक, संघटित व्हावे लागेल. जातीपाती, धर्म प्रांत या भेदामुळे परकीय आक्रमणे सुरू झाली. अफगाणिस्तान गेले, नेपाळ, तिबेट, श्रीलंका, म्यानमार हे सर्व देश वेगळे झाले. पाकिस्तान आणि बांग्लादेशची फाळणी झाली. भारताची सीमा ८३ लाख वर्ग किलोमीटरवरून ३३ लाख वर्ग किलोमीटरवर आल्याचे हिरेमठ म्हणाले.

यावेळी ‘सेवा सर्वोपरी’ या जनकल्याण समितीच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यवाह तुकाराम नाईक यांनी त्याची माहिती दिली. डॉ. साताळकर यांनी प्रास्ताविक केले. तर, अरुण डंके यांनी आभार मानले.

====

‘भारत एक खोज’ करताना मनातील हिंदुत्व जागे झाले. परदेशात न जाता आपल्या संस्कृती आणि कलेचे जतन करण्याचा निर्णय घेतला. कर्जतच्या स्टुडिओमध्ये अशा अनेक कलाकृती निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. लोक ताजमहालकडे जागतिक आश्चर्य म्हणून पाहतात. परंतु, जेव्हा अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहिल तेव्हा भारतीयच नव्हे तर जगभरातील लोक अभिमानाने त्याच्याबद्दल सांगतील.

- नितीन चंद्रकांत देसाई