शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

देशात आजही भय, लोभाद्वारे धर्मांतरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

पुणे : समरस असलेला समाजच संघटित होऊ शकतो. अस्पृश्यता, भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही. समरसता केवळ भाषणापुरती ...

पुणे : समरस असलेला समाजच संघटित होऊ शकतो. अस्पृश्यता, भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही. समरसता केवळ भाषणापुरती नव्हे तर जीवनात आचरण करण्याची गोष्ट आहे. देशात आजही भय, लोभाद्वारे धर्मांतरण सुरू असून ही गंभीर समस्या असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले.

रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्यावतीने (महाराष्ट्र प्रांत) देण्यात येणाऱ्या २६ व्या श्री गोळवलकर गुरुजी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, समितीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांच्यासह पुरस्कारार्थी हिंदू मुन्नाणी संघटनेचे के. सुब्रह्मण्यम आणि वास्तुशिल्पकार चंद्रकांत सोमपुरा यांचे पुत्र निखिल सोमपुरा उपस्थित होते. यावेळी सोमपुरा यांना कला क्षेत्रासाठी साताळकर यांच्या हस्ते तर के. सुब्रह्मण्यम यांना हिरेमठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी हिरेमठ म्हणाले, पवित्रता, उदात्तता आणि विशालता ही मंदिरांची वैशिष्ट्ये आहेत. मंदिरांमधून घडणारा हा संस्कार आहे. आपल्या पूर्वजांच्या श्रेष्ठ संस्कृती, जीवनमूल्य आणि संस्कारातून राष्ट्र व समाजाची निर्मिती झालेली आहे. यापुढे समाजाला जागरूक, संघटित व्हावे लागेल. जातीपाती, धर्म प्रांत या भेदामुळे परकीय आक्रमणे सुरू झाली. अफगाणिस्तान गेले, नेपाळ, तिबेट, श्रीलंका, म्यानमार हे सर्व देश वेगळे झाले. पाकिस्तान आणि बांग्लादेशची फाळणी झाली. भारताची सीमा ८३ लाख वर्ग किलोमीटरवरून ३३ लाख वर्ग किलोमीटरवर आल्याचे हिरेमठ म्हणाले.

यावेळी ‘सेवा सर्वोपरी’ या जनकल्याण समितीच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यवाह तुकाराम नाईक यांनी त्याची माहिती दिली. डॉ. साताळकर यांनी प्रास्ताविक केले. तर, अरुण डंके यांनी आभार मानले.

====

‘भारत एक खोज’ करताना मनातील हिंदुत्व जागे झाले. परदेशात न जाता आपल्या संस्कृती आणि कलेचे जतन करण्याचा निर्णय घेतला. कर्जतच्या स्टुडिओमध्ये अशा अनेक कलाकृती निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. लोक ताजमहालकडे जागतिक आश्चर्य म्हणून पाहतात. परंतु, जेव्हा अयोध्येमध्ये राममंदिर उभे राहिल तेव्हा भारतीयच नव्हे तर जगभरातील लोक अभिमानाने त्याच्याबद्दल सांगतील.

- नितीन चंद्रकांत देसाई