शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

तरुणाईशी संवाद हीच माझ्या कार्यामागील ऊर्जा

By admin | Updated: June 21, 2017 06:18 IST

भाई म्हणाले, जगामध्ये जे बदल होतात, अनेक घडामोडी होतात, जागतिकीकरणामुळे जे बदल होतात, त्यांचा अभ्यास करावा लागतो.

भाई म्हणाले, जगामध्ये जे बदल होतात, अनेक घडामोडी होतात, जागतिकीकरणामुळे जे बदल होतात, त्यांचा अभ्यास करावा लागतो. ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था बदलली त्याचा अभ्यास करावा लागतो. जगामध्ये अनेक गोष्टींमध्ये जे बदल झाले आहेत, त्याचा अभ्यास करावा लागतो.इंडस्ट्रिअल कॅपिटलइझम आला फायनान्शिअल कॅपिटलइझम आला की तो समजावून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी वाचावं लागतं. अभ्यास करावा लागतो. मी आजही अभ्यास करतो. नवीन नवीन विषय समजावून घेतो आणि जिथे जिथे मला शक्य आहे, तिथे तरुणांना ते समजावून देतो. तरुणांचे आणि माझे संबंध फार मजबूत आहेत आणि तरुण मला आनंदाने भेटतात, हे माझे मोठे भाग्य आहे. त्यामुळे माझी तब्येत चांगली राहते.आज जगभर जागतिकीकरणाचे वर्चस्व आहे. जागतिकीकरण हे वित्तीय भांडवलशाहीचे बाळ आहे. आता पोस्ट इंडस्ट्रिअल वर्ल्ड आहे. पूर्वी कारखानदारी उभी करण्यावर भर होता. आता गुंतवणुकीवर, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यावर भर आहे. त्याला वित्तीयभांडवलशाही म्हणतात. या वित्तीय भांडवलशाहीला स्वार्थाशिवाय काही दिसत नाही. नफा कसा वाढेल याशिवाय वित्तीय भांडवलशाहीला काही दिसत नाही. पाश्चात्त्य देशांमध्ये अफाट पैसा होता. तो त्याच देशात गुंतविणे अशक्य होते.त्यामुळे जगाचे मार्केट करण्यात आले.या भांडवलशाहीला शेतकरी, कामगार यांच्याशी काही देणेघेणे नाही. देशात गेल्या २५ वर्षांमध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील १७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या देशात असे कधी घडले नव्हते. शेतीची जमीन हिसकावून ती योग्य मोबदला न देता भांडवलदारांच्या घशात घालण्यात आली. औद्योगिकीकरण महत्त्वाचे असेल तर शेती बुडाली पाहिजे ही या वित्तीय भांडवलशाहीची भूमिका आहे. त्यामुळे जगात कुठेही न घडलेला साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा दुर्दैवी प्रकार या देशात झाला. कायदा पायदळी तुडवून कंत्राटी कामगार नेमण्याचा धडाका सुरू झाला. या वित्तीय भांडवलशाहीचा जगभर धुमाकूळ सुरू झाला. जगभर विषमता, बेरोजगारी आणि प्रदूषण या कळीच्या समस्या बनल्या. जागतिकीकरणामुळे काही चांगल्या, काही वाईट प्रतिक्रिया उमटल्या. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे, समाजवादी मांडणी करणारे बर्नी सँडस, शमा सावंत यांच्यासारखे प्रतिनिधी निवडून आले. त्यामुळे विषमतेविरुद्धची लढाई लढायची असेल तर समाजवादाला पर्याय नाही. ते म्हणाले, काँग्रेसची धूळधाण झाली. केवळ ४४ खासदार निवडून आले. विरोधी पक्षाचाही दर्जा मिळू शकलेला नाही. नरेंद्र मोदी स्वत:च्या बळावर आले नाहीत, तर काँग्रेसचा जो दुर्व्यवहार होता, त्याची ती प्रतिक्रिया होती.काँग्रेसने जागतिकीकरणाचे धोरण अंमलात आणले, मनमोहनसिंग यांनी १९९१ चे अंदाजपत्रक आणून त्याला सुरुवात केली, त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी घडत आहेत. काँग्रेसने आता आर्थिक धोरणांचा फेरविचार करायची, मनमोहनसिंग यांचे आर्थिक धोरण बाजूला सारण्याची गरज आहे. अन्यथा हा मोठी परंपरा असलेला पक्ष नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.