शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

भिगवणला राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे काढण्यावरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाला, असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाला, असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत. तर भिगवणमधील मतदारांनी मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाला कंटाळून विश्रांती घेण्याचा निकाल दिला असल्याने त्यांनी आतातरी विकासाच्या कामात हस्तक्षेप टाळावा, असे सरपंच तानाजी वायसे मत व्यक्त केले.

भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्रे काढल्याचे मागील सताधारी यांचे म्हणणे आहे. तर राजशिष्टाचार नुसार लावलेले छायाचित्र हटविणे हे सताधारी पक्षाचे व्यक्ती आणि पक्षद्वेषी भूमिका असल्यामुचे म्हणणे मांडीत कार्यकर्त्यांनी ग्रामपंचातीवर मोर्चा नेत छायाचित्र पूर्ववत लावण्याची मागणी केली. या नाट्यामुळे दोन दिवस वातावरण गरम आहे. तर निवडणूक आचारसंहिता काळात हे छायाचित्र काढले असल्याचे आणि राजशिष्टाचारानुसार योग्य ते छायाचित्रे लावले जाणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील सत्ताबदलाच्या वेळी त्यावेळी असणाऱ्या छायाचित्रांचे काय झाले होते याचे हे आत्मपरीक्षण करावे असे बोलले जात आहे.

याबाबत सरपंच तानाजी वायसे आणि पराग जाधव म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता येत नसल्यामुळे अशी नौटंकी केली जात आहे. मागील सत्ताबदलावेळी विरोधकांनी ग्रामपंचायत कार्यालयात असणारे तत्कालीन छायाचित्रांचे काय करण्यात आले होते याचा विचार केल्यास याचे उत्तर मिळेल असे मत व्यक्त केले. तर सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सांगितले. तर विरोधकांनी विकासकामांत काही सूचना मांडल्यास त्या नक्की स्वीकारू. गेल्या ५ वर्षांत झालेले सुडाचे राजकारण केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट

नवनिर्वाचित पदाधिकारी गावाच्या विकासासाठी समर्थ असून विरोधकांना मतदारांनी विश्रांतीसाठी निकाल दिला असल्यामुळे मतदारांच्या मताचा आदर ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे. यामुळे हे छायाचित्रे बदलाचे राजकारण मोठ्या प्रमाणात रंगत आहे. याचा भिगवणच्या विकासावर परिणाम होवू नये, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.