शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भिगवणला राष्ट्रवादीच्या नेत्यांची छायाचित्रे काढण्यावरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिगवण : भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाला, असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिगवण : भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाला, असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत. तर भिगवणमधील मतदारांनी मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाला कंटाळून विश्रांती घेण्याचा निकाल दिला असल्याने त्यांनी आतातरी विकासाच्या कामात हस्तक्षेप टाळावा, असे सरपंच तानाजी वायसे मत व्यक्त केले.

भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे छायाचित्रे काढल्याचे मागील सताधारी यांचे म्हणणे आहे. तर राजशिष्टाचार नुसार लावलेले छायाचित्र हटविणे हे सताधारी पक्षाचे व्यक्ती आणि पक्षद्वेषी भूमिका असल्यामुचे म्हणणे मांडीत कार्यकर्त्यांनी ग्रामपंचातीवर मोर्चा नेत छायाचित्र पूर्ववत लावण्याची मागणी केली. या नाट्यामुळे दोन दिवस वातावरण गरम आहे. तर निवडणूक आचारसंहिता काळात हे छायाचित्र काढले असल्याचे आणि राजशिष्टाचारानुसार योग्य ते छायाचित्रे लावले जाणार असल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील सत्ताबदलाच्या वेळी त्यावेळी असणाऱ्या छायाचित्रांचे काय झाले होते याचे हे आत्मपरीक्षण करावे असे बोलले जात आहे.

याबाबत सरपंच तानाजी वायसे आणि पराग जाधव म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता येत नसल्यामुळे अशी नौटंकी केली जात आहे. मागील सत्ताबदलावेळी विरोधकांनी ग्रामपंचायत कार्यालयात असणारे तत्कालीन छायाचित्रांचे काय करण्यात आले होते याचा विचार केल्यास याचे उत्तर मिळेल असे मत व्यक्त केले. तर सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असल्याचे सांगितले. तर विरोधकांनी विकासकामांत काही सूचना मांडल्यास त्या नक्की स्वीकारू. गेल्या ५ वर्षांत झालेले सुडाचे राजकारण केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.

चौकट

नवनिर्वाचित पदाधिकारी गावाच्या विकासासाठी समर्थ असून विरोधकांना मतदारांनी विश्रांतीसाठी निकाल दिला असल्यामुळे मतदारांच्या मताचा आदर ठेवावा, असा सल्ला दिला जात आहे. यामुळे हे छायाचित्रे बदलाचे राजकारण मोठ्या प्रमाणात रंगत आहे. याचा भिगवणच्या विकासावर परिणाम होवू नये, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.