शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

नियंत्रण कक्षाला ‘सौजन्याचे वावडे’

By admin | Updated: September 21, 2015 04:12 IST

सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे वावडे’ आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उद्धट उत्तरे मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, याची दखल संबंधित ‘सीआरओ’ घेत नसल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलिसांचा १०० क्रमांक मोडतो. या क्रमांकावर दिवसभरात काही हजारांच्या पटीत फोन येतात. बऱ्याचदा हा क्रमांक ‘एंगेज’च लागतो. नियंत्रण कक्षातील पोलीस हे फोन उचलतात. तेव्हा ज्याला काही माहिती द्यायची असते त्यालाच पोलिसांकडून प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महत्त्वाची माहिती हवी असते तेव्हाही उर्मटपणे उत्तरे दिली जातात. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद पोलीस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असताना नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याने बोलण्याचे सोपस्कारही केले जात नाहीत. आपल्या भागात भांडणे सुरू असेल,रात्री उशिरापर्यंत स्पिकर सुरू असल्याने त्रास होत असेल, तर नागरिक १०० क्रमांकावर फोन करतात़ तेथील कर्मचारी मार्शलला अथवा स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी पाठवितात़ त्यांना ज्यांच्याकडून फोन आला, त्यांचा नंबर दिला जातो़ हे कर्मचारी तेथे गेल्यावर त्यांना फोन करुन तुमची काय तक्रार आहे, असे विचारतात़ या प्रकाराने तक्रार करणाऱ्यांचे नाव उघड होत असल्याने पुढे तक्रार केली म्हणून त्यांनाच त्रास सहन करण्याची वेळ यापूर्वी अनेकदा आली आहे़ जर एखादा गुन्हा, घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी कळवलीच, तर नियंत्रण कक्षाकडून माहिती देणाऱ्याचाच मोबाईल क्रमांक गस्तीवरील पोलिसांना (मार्शल) दिला जातो. घटनास्थळावर पोचल्यावर मार्शलवरील पोलीस सर्वांत आधी माहिती देणाऱ्याला फोन करतात. त्यालाच नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सध्या काही पोलीस ठाण्यांमधून संलग्न केलेले अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. तर काही जण शहरात बदलून आलेले आहेत; मात्र त्यांना अद्याप ‘पोस्टिंग’ मिळालेले नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रंदिन ‘पोस्टिंग’च दिसत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे त्यांचे लक्ष नाही. यासोबतच नियंत्रण कक्षाचे काही कर्मचारी व अधिकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या दर महिन्याच्या ‘सेवे’मध्ये मग्न असल्यामुळे आम्हाला काय कुणाची भीती, अशा अविर्भावात वावरत आहेत.