शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

नियंत्रण कक्षाला ‘सौजन्याचे वावडे’

By admin | Updated: September 21, 2015 04:12 IST

सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे वावडे’ आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उद्धट उत्तरे मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, याची दखल संबंधित ‘सीआरओ’ घेत नसल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलिसांचा १०० क्रमांक मोडतो. या क्रमांकावर दिवसभरात काही हजारांच्या पटीत फोन येतात. बऱ्याचदा हा क्रमांक ‘एंगेज’च लागतो. नियंत्रण कक्षातील पोलीस हे फोन उचलतात. तेव्हा ज्याला काही माहिती द्यायची असते त्यालाच पोलिसांकडून प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महत्त्वाची माहिती हवी असते तेव्हाही उर्मटपणे उत्तरे दिली जातात. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद पोलीस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असताना नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याने बोलण्याचे सोपस्कारही केले जात नाहीत. आपल्या भागात भांडणे सुरू असेल,रात्री उशिरापर्यंत स्पिकर सुरू असल्याने त्रास होत असेल, तर नागरिक १०० क्रमांकावर फोन करतात़ तेथील कर्मचारी मार्शलला अथवा स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी पाठवितात़ त्यांना ज्यांच्याकडून फोन आला, त्यांचा नंबर दिला जातो़ हे कर्मचारी तेथे गेल्यावर त्यांना फोन करुन तुमची काय तक्रार आहे, असे विचारतात़ या प्रकाराने तक्रार करणाऱ्यांचे नाव उघड होत असल्याने पुढे तक्रार केली म्हणून त्यांनाच त्रास सहन करण्याची वेळ यापूर्वी अनेकदा आली आहे़ जर एखादा गुन्हा, घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी कळवलीच, तर नियंत्रण कक्षाकडून माहिती देणाऱ्याचाच मोबाईल क्रमांक गस्तीवरील पोलिसांना (मार्शल) दिला जातो. घटनास्थळावर पोचल्यावर मार्शलवरील पोलीस सर्वांत आधी माहिती देणाऱ्याला फोन करतात. त्यालाच नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सध्या काही पोलीस ठाण्यांमधून संलग्न केलेले अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. तर काही जण शहरात बदलून आलेले आहेत; मात्र त्यांना अद्याप ‘पोस्टिंग’ मिळालेले नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रंदिन ‘पोस्टिंग’च दिसत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे त्यांचे लक्ष नाही. यासोबतच नियंत्रण कक्षाचे काही कर्मचारी व अधिकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या दर महिन्याच्या ‘सेवे’मध्ये मग्न असल्यामुळे आम्हाला काय कुणाची भीती, अशा अविर्भावात वावरत आहेत.