शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

नियंत्रण कक्षाला ‘सौजन्याचे वावडे’

By admin | Updated: September 21, 2015 04:12 IST

सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच शहरातील सर्व घटनांची माहिती ठेवण्यासाठीच्या पोलीस नियंत्रण कक्षामध्ये नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ‘सौजन्याचे वावडे’ आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यानंतर उद्धट उत्तरे मिळत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून, याची दखल संबंधित ‘सीआरओ’ घेत नसल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये पोलिसांचा १०० क्रमांक मोडतो. या क्रमांकावर दिवसभरात काही हजारांच्या पटीत फोन येतात. बऱ्याचदा हा क्रमांक ‘एंगेज’च लागतो. नियंत्रण कक्षातील पोलीस हे फोन उचलतात. तेव्हा ज्याला काही माहिती द्यायची असते त्यालाच पोलिसांकडून प्रश्न विचारायला सुरुवात केली जाते. अनेकदा अडचणीत सापडलेल्या नागरिकांना महत्त्वाची माहिती हवी असते तेव्हाही उर्मटपणे उत्तरे दिली जातात. पोलीस आयुक्त के. के. पाठक आणि सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद पोलीस दल अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न होत असताना नियंत्रण कक्षाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याने बोलण्याचे सोपस्कारही केले जात नाहीत. आपल्या भागात भांडणे सुरू असेल,रात्री उशिरापर्यंत स्पिकर सुरू असल्याने त्रास होत असेल, तर नागरिक १०० क्रमांकावर फोन करतात़ तेथील कर्मचारी मार्शलला अथवा स्थानिक पोलिसांना त्या ठिकाणी पाठवितात़ त्यांना ज्यांच्याकडून फोन आला, त्यांचा नंबर दिला जातो़ हे कर्मचारी तेथे गेल्यावर त्यांना फोन करुन तुमची काय तक्रार आहे, असे विचारतात़ या प्रकाराने तक्रार करणाऱ्यांचे नाव उघड होत असल्याने पुढे तक्रार केली म्हणून त्यांनाच त्रास सहन करण्याची वेळ यापूर्वी अनेकदा आली आहे़ जर एखादा गुन्हा, घटना पाहून त्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी कळवलीच, तर नियंत्रण कक्षाकडून माहिती देणाऱ्याचाच मोबाईल क्रमांक गस्तीवरील पोलिसांना (मार्शल) दिला जातो. घटनास्थळावर पोचल्यावर मार्शलवरील पोलीस सर्वांत आधी माहिती देणाऱ्याला फोन करतात. त्यालाच नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. पोलीस नियंत्रण कक्षामध्ये सध्या काही पोलीस ठाण्यांमधून संलग्न केलेले अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. तर काही जण शहरात बदलून आलेले आहेत; मात्र त्यांना अद्याप ‘पोस्टिंग’ मिळालेले नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रात्रंदिन ‘पोस्टिंग’च दिसत असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे त्यांचे लक्ष नाही. यासोबतच नियंत्रण कक्षाचे काही कर्मचारी व अधिकारी उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या दर महिन्याच्या ‘सेवे’मध्ये मग्न असल्यामुळे आम्हाला काय कुणाची भीती, अशा अविर्भावात वावरत आहेत.