शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण कक्ष कालबाह्य

By admin | Updated: March 21, 2016 00:58 IST

शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे.

पुणे : शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे. दुर्घटनेच्या वेळी तत्काळ कुमक व मदत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या या कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये बिघाड झाल्याने अंतर्गत संपर्क यंत्रणा कोलमडून पडली आहे. नियंत्रण कक्षातील शुक्रवारी अचानक बंद पडलेल्या दोन फोन लाइनची दुरुस्ती झाली असली तरी त्या पुन्हा कधी बंद पडतील याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या आत्पकालीन प्रसंगी तत्काळ व पुरेशी मदत पोहोचण्यात अग्निशमन प्रशासनास अपयशी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरामध्ये आत्पकालीन प्रसंगी तत्काळ मदत उपलब्ध करून देणे ही बीपीएमसी अ‍ॅक्टनुसार महापालिका प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी शहरामध्ये मुख्य अग्निशमन केंद्रासह १५ उपकेंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये ५०० अधिकारी व जवान कार्यरत आहेत. अग्निशमन दलाची सर्वाधिक भिस्त ही नियंत्रण कक्षावर अवलंबून असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ नजीकच्या केंद्राशी संपर्क साधून काही मिनिटांत अग्निशमनचे जवान त्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित असते, त्यासाठी नियंत्रण कक्षातून वेगाने हालचाली कराव्या लागतात.भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. नियंत्रण कक्षाचे ३ शिफ्टमध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये २० ते २५ जवान कार्यरत असतात. या कक्षामध्ये अद्यापही जुनाट यंत्रणेद्वारेच काम पाहिले जात आहे. तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती झाल्याने पोलीस, गुन्हे शाखा व इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची नियंत्रण कक्ष अत्याधुनिक झाली असताना अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष मात्र खूप वर्षे मागे आहे. या कक्षाचे अद्याप संगणकीकरण झालेले नाही. येणारे कॉल्सची माहिती रजिस्टरवर नोंदवून ठेवावी लागते. ईपीबीएक्स बॉक्स बंद पडल्याने आता अंतर्गत फोनची यंत्रणाही बंद झाली आहे. त्यामुळे मोबाइलचा आधार आत्पकालीन प्रसंगात जवानांना घ्यावा लागतो आहे. भूकंप व इतर मोठ्या दुर्घटनामध्ये मोबाइलचे नेटवर्क आपोआप बंद पडते. त्या वेळी मोबाइलवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. नियंत्रण कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये शॉटसर्किट होऊन तो बंद पडला आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. मात्र यामुळे कक्षात काम करणे जवानांना खूप अवघड झाले आहे. नेमका कोणता फोन वाजतो आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही.आत्पकालीन यंत्रणेचा स्मार्ट सिटीला विसरमहापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ३ हजार कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट सिटी आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रकल्पात आत्पकालीन यंत्रणेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. मोबाइल अ‍ॅप, सॉफ्टवेअर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बरेच काही घरबसल्या देण्याची कल्पना त्यांनी त्यामध्ये मांडली आहे. मात्र, आत्पकालीन यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या अग्निशमनच्या जुनाट यंत्रणेमध्ये बदल करण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला आहे.