शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

नियंत्रण कक्ष कालबाह्य

By admin | Updated: March 21, 2016 00:58 IST

शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे.

पुणे : शहरात कोणतीही दुर्घटना, अपघात, आगीची घटना घडल्यास नागरिकांकडून पहिला फोन जिथे जातो, त्या अग्निशमन दलाचा नियंत्रण कक्षच अत्यवस्थ अवस्थेत आहे. दुर्घटनेच्या वेळी तत्काळ कुमक व मदत पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या या कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये बिघाड झाल्याने अंतर्गत संपर्क यंत्रणा कोलमडून पडली आहे. नियंत्रण कक्षातील शुक्रवारी अचानक बंद पडलेल्या दोन फोन लाइनची दुरुस्ती झाली असली तरी त्या पुन्हा कधी बंद पडतील याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे मोठ्या आत्पकालीन प्रसंगी तत्काळ व पुरेशी मदत पोहोचण्यात अग्निशमन प्रशासनास अपयशी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शहरामध्ये आत्पकालीन प्रसंगी तत्काळ मदत उपलब्ध करून देणे ही बीपीएमसी अ‍ॅक्टनुसार महापालिका प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी शहरामध्ये मुख्य अग्निशमन केंद्रासह १५ उपकेंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रामध्ये ५०० अधिकारी व जवान कार्यरत आहेत. अग्निशमन दलाची सर्वाधिक भिस्त ही नियंत्रण कक्षावर अवलंबून असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर तत्काळ नजीकच्या केंद्राशी संपर्क साधून काही मिनिटांत अग्निशमनचे जवान त्या ठिकाणी पोहोचणे अपेक्षित असते, त्यासाठी नियंत्रण कक्षातून वेगाने हालचाली कराव्या लागतात.भवानी पेठेतील मुख्य अग्निशमन केंद्रामध्ये नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. नियंत्रण कक्षाचे ३ शिफ्टमध्ये काम चालते. एका शिफ्टमध्ये २० ते २५ जवान कार्यरत असतात. या कक्षामध्ये अद्यापही जुनाट यंत्रणेद्वारेच काम पाहिले जात आहे. तंत्रज्ञानामध्ये वेगाने प्रगती झाल्याने पोलीस, गुन्हे शाखा व इतर महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांची नियंत्रण कक्ष अत्याधुनिक झाली असताना अग्निशमन दलाचे नियंत्रण कक्ष मात्र खूप वर्षे मागे आहे. या कक्षाचे अद्याप संगणकीकरण झालेले नाही. येणारे कॉल्सची माहिती रजिस्टरवर नोंदवून ठेवावी लागते. ईपीबीएक्स बॉक्स बंद पडल्याने आता अंतर्गत फोनची यंत्रणाही बंद झाली आहे. त्यामुळे मोबाइलचा आधार आत्पकालीन प्रसंगात जवानांना घ्यावा लागतो आहे. भूकंप व इतर मोठ्या दुर्घटनामध्ये मोबाइलचे नेटवर्क आपोआप बंद पडते. त्या वेळी मोबाइलवर अवलंबून राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. नियंत्रण कक्षातील ईपीबीएक्स बॉक्समध्ये शॉटसर्किट होऊन तो बंद पडला आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. मात्र यामुळे कक्षात काम करणे जवानांना खूप अवघड झाले आहे. नेमका कोणता फोन वाजतो आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाही.आत्पकालीन यंत्रणेचा स्मार्ट सिटीला विसरमहापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी ३ हजार कोटी रुपये खर्चाचा स्मार्ट सिटी आराखडा जाहीर केला आहे. मात्र, प्रकल्पात आत्पकालीन यंत्रणेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. मोबाइल अ‍ॅप, सॉफ्टवेअर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बरेच काही घरबसल्या देण्याची कल्पना त्यांनी त्यामध्ये मांडली आहे. मात्र, आत्पकालीन यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या अग्निशमनच्या जुनाट यंत्रणेमध्ये बदल करण्याचा पालिका प्रशासनाला विसर पडला आहे.