शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
3
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
4
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
5
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
6
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
7
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
8
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
9
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
10
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
11
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

"पक्षासाठी ५० वर्षे, जोडीदार गमावल्यांतरही काम सुरू ठेवलं", पण..; वडिलांसाठी लेकाचं भावूक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:54 IST

मुंबई - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या देशातील ५६ जागांसाठी तर महाराष्ट्रातील ...

मुंबई - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या देशातील ५६ जागांसाठी तर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा काल १५ फेब्रुवारी रोजी अंतिम दिवस होता. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून भाजपाने ३ जणांना उमेदवारी दिली असून त्यामध्ये एक नाव माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं आहे. अशोक चव्हाणांना संधी मिळाल्याने भाजपामधील निष्ठावाना कार्यकर्त्याची संधी हुकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. 

भाजपाचे निष्ठावंत म्हणून गेली कित्येक दशकं काम करणाऱ्या माधव भंडारी यांना यंदा राज्यसभेवर संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, यावेळीही माधव भंडारी यांचे नाव केवळ चर्चेपुरतेच राहिले. भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली. मेधा कुलकर्णी यांच्यावर विधानसभा निवडणुकांवेळी झालेला अन्याय दूर करत, पक्षाने त्यांना आता दिल्ली वारीची संधी दिली. मात्र, माधव भंडारी यांना यावेळीही प्रतिक्षा यादीतच ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळेच, माधव भंडारी यांचे पुत्र चिन्मय भंडारी यांनी ट्विटरवरुन भली मोठी पोस्ट लिहित मनातील खदखद बोलून दाखवली. 

चिन्मय यांची ट्विटर पोस्ट

चिन्मय यांनी पोस्ट लिहितानाचा ही माझी वैयक्तिक भावना असल्याचे स्पष्ट केले आहे. मला आज माझ्या वडिलांबद्दल लिहायचं आहे, असेही त्यांनी म्हटलं. 

माझे वडिल माधव भंडारी यांनी १९७५ ला जनसंघ/ जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर १९८० मध्ये भाजपची निर्मिती झाली. आता, त्याला जवळपास ५० वर्ष झाले. या ५० वर्षांच्या काळात माधव भंडारी यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी संघटना बांधणीचं काम केलं. हजारो लोकांना, शेकडो गावांना मदत केली. सत्तेच्या गैरवापराविरोधात माधव भंडारी यांनी भूमिका मांडली, सामान्य लोकांचे प्रश्न मांडले. राज्यात २००८ ते २०१४ या कालावधी आघाडी सरकार असताना भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी कणखरपणे भूमिका बजावली. 

२०१४ मध्ये पक्षाचं सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना आणि ते प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यातील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेक पुस्तकाचं लेखन केलं, असं चिन्मय भंडारी यानं ट्विटरवरुन म्हटलं आहे. हे सर्व सुरु असताना प्रसिद्धीच्या झोतापासून ते कायम दूर राहिले. आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी कधीही वापर केला नाही. म्हणूनच, राज्यात ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं अशा राजकीय नेत्यांपैकी एक म्हणजे माधव भंडारी आहेत, असेही मुलगा चिन्मय यांनी म्हटले. तसेच, सिंधुदुर्गमधील घरासाठीच्या वीज जोडणीचा प्रसंगही त्यांनी येथे सांगितला.  

मी माझ्या जीवनात १२ वेळा असं अनुभवलं की, वडिलांचं नाव १२ वेळा विधानसभा किंवा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी चर्चेत आलं, पण उमेदवारी मिळाली नाही. पण, पक्षाच्या नेतृत्त्वाला प्रश्न विचारायचे नाहीत, असेही चिन्मय यांनी म्हटलं आहे. कारण, माधव भंडारी यांनी याबाबत जाहीरपणे कधीच भाष्य केलं नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्यभर काम केलं, त्याला दुखावण्याचं काम त्यांनी केलं नाही. प्रकृती बरी नसताना आणि आयुष्यातील जोडीदार गमावल्यानंतरही पक्षासाठी काम करणं त्यांनी थांबवलं नाही, अशी खंत चिन्मय यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान, काही लोक ज्यांना पक्षानं मंत्री केलं, खासदार केलं अशांनीही आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणताना मी पाहिलंय, असे म्हणत नाव न घेता भाजपासोबत आलेल्यांना अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकTwitterट्विटर