शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

"पक्षासाठी ५० वर्षे, जोडीदार गमावल्यांतरही काम सुरू ठेवलं", पण..; वडिलांसाठी लेकाचं भावूक पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 12:54 IST

मुंबई - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या देशातील ५६ जागांसाठी तर महाराष्ट्रातील ...

मुंबई - आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राज्यसभा निवडणुका पार पडत आहेत. राज्यसभेच्या देशातील ५६ जागांसाठी तर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा काल १५ फेब्रुवारी रोजी अंतिम दिवस होता. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून भाजपाने ३ जणांना उमेदवारी दिली असून त्यामध्ये एक नाव माजी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं आहे. अशोक चव्हाणांना संधी मिळाल्याने भाजपामधील निष्ठावाना कार्यकर्त्याची संधी हुकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. 

भाजपाचे निष्ठावंत म्हणून गेली कित्येक दशकं काम करणाऱ्या माधव भंडारी यांना यंदा राज्यसभेवर संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, यावेळीही माधव भंडारी यांचे नाव केवळ चर्चेपुरतेच राहिले. भाजपाने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली. मेधा कुलकर्णी यांच्यावर विधानसभा निवडणुकांवेळी झालेला अन्याय दूर करत, पक्षाने त्यांना आता दिल्ली वारीची संधी दिली. मात्र, माधव भंडारी यांना यावेळीही प्रतिक्षा यादीतच ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळेच, माधव भंडारी यांचे पुत्र चिन्मय भंडारी यांनी ट्विटरवरुन भली मोठी पोस्ट लिहित मनातील खदखद बोलून दाखवली. 

चिन्मय यांची ट्विटर पोस्ट

चिन्मय यांनी पोस्ट लिहितानाचा ही माझी वैयक्तिक भावना असल्याचे स्पष्ट केले आहे. मला आज माझ्या वडिलांबद्दल लिहायचं आहे, असेही त्यांनी म्हटलं. 

माझे वडिल माधव भंडारी यांनी १९७५ ला जनसंघ/ जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, त्यानंतर १९८० मध्ये भाजपची निर्मिती झाली. आता, त्याला जवळपास ५० वर्ष झाले. या ५० वर्षांच्या काळात माधव भंडारी यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी संघटना बांधणीचं काम केलं. हजारो लोकांना, शेकडो गावांना मदत केली. सत्तेच्या गैरवापराविरोधात माधव भंडारी यांनी भूमिका मांडली, सामान्य लोकांचे प्रश्न मांडले. राज्यात २००८ ते २०१४ या कालावधी आघाडी सरकार असताना भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी कणखरपणे भूमिका बजावली. 

२०१४ मध्ये पक्षाचं सरकार आल्यानंतर निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना आणि ते प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. राज्यातील स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेक पुस्तकाचं लेखन केलं, असं चिन्मय भंडारी यानं ट्विटरवरुन म्हटलं आहे. हे सर्व सुरु असताना प्रसिद्धीच्या झोतापासून ते कायम दूर राहिले. आपल्या पदाचा आणि प्रभावाचा वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी कधीही वापर केला नाही. म्हणूनच, राज्यात ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं अशा राजकीय नेत्यांपैकी एक म्हणजे माधव भंडारी आहेत, असेही मुलगा चिन्मय यांनी म्हटले. तसेच, सिंधुदुर्गमधील घरासाठीच्या वीज जोडणीचा प्रसंगही त्यांनी येथे सांगितला.  

मी माझ्या जीवनात १२ वेळा असं अनुभवलं की, वडिलांचं नाव १२ वेळा विधानसभा किंवा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी चर्चेत आलं, पण उमेदवारी मिळाली नाही. पण, पक्षाच्या नेतृत्त्वाला प्रश्न विचारायचे नाहीत, असेही चिन्मय यांनी म्हटलं आहे. कारण, माधव भंडारी यांनी याबाबत जाहीरपणे कधीच भाष्य केलं नाही. ज्या पक्षाच्या उभारणीसाठी आयुष्यभर काम केलं, त्याला दुखावण्याचं काम त्यांनी केलं नाही. प्रकृती बरी नसताना आणि आयुष्यातील जोडीदार गमावल्यानंतरही पक्षासाठी काम करणं त्यांनी थांबवलं नाही, अशी खंत चिन्मय यांनी बोलून दाखवली. 

दरम्यान, काही लोक ज्यांना पक्षानं मंत्री केलं, खासदार केलं अशांनीही आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणताना मी पाहिलंय, असे म्हणत नाव न घेता भाजपासोबत आलेल्यांना अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला.  

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकTwitterट्विटर