शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगरला भामा-आसखेडचा दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, ...

चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केल्याने आज दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

गेल्या महिन्यात १ जानेवारीला मुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भामा-आसखेड योजनेच्या पाण्याची सुरुवात केली. भामा-आसखेड योजनेतून वडगाव शेरी मतदार संघासाठी पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई केल्यामुळे आज नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. योजना आम्ही पूर्ण केली असे ढोल बडवणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते, कार्यकर्ते आठ दिवस झाले विविध भागात दूषित पाणीपुरवठा होत असताना गप्प का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी केलेल्या घाईमुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास पूर्ण वेळ मिळाला नाही.

याबाबत पाणीपुरवठा अधिकारी रमेश वाघमारे व दत्ता तांबारे यांच्या संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास

विमाननगरमधील यमुनानगर, भीमनगर विमाननगर या भागातील ७०० हून अधिक घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने नागरिकांना गॅस्ट्रो सारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास होत असल्याचे यमुनानगरमधील रहिवासी विनोद बनसोडे यांनी सांगितले. मात्र, तरीदेखील पाणीपुरवठा अधिकारी किंवा कोणत्याही स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न घातल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

... तर आम्ही अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणार

पाणीपुरवठा अधिकारी यांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास आम्ही अधिकाऱ्यांना भामा आसखेड योजनेचे दूषित पाणी पाजणार असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.

फोटो : वडगाव शेरी भागात भामा आसखेड योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मागील आठ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे.