शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगरला भामा-आसखेडचा दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, ...

चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केल्याने आज दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

गेल्या महिन्यात १ जानेवारीला मुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भामा-आसखेड योजनेच्या पाण्याची सुरुवात केली. भामा-आसखेड योजनेतून वडगाव शेरी मतदार संघासाठी पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई केल्यामुळे आज नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. योजना आम्ही पूर्ण केली असे ढोल बडवणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते, कार्यकर्ते आठ दिवस झाले विविध भागात दूषित पाणीपुरवठा होत असताना गप्प का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी केलेल्या घाईमुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास पूर्ण वेळ मिळाला नाही.

याबाबत पाणीपुरवठा अधिकारी रमेश वाघमारे व दत्ता तांबारे यांच्या संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास

विमाननगरमधील यमुनानगर, भीमनगर विमाननगर या भागातील ७०० हून अधिक घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने नागरिकांना गॅस्ट्रो सारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास होत असल्याचे यमुनानगरमधील रहिवासी विनोद बनसोडे यांनी सांगितले. मात्र, तरीदेखील पाणीपुरवठा अधिकारी किंवा कोणत्याही स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न घातल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

... तर आम्ही अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणार

पाणीपुरवठा अधिकारी यांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास आम्ही अधिकाऱ्यांना भामा आसखेड योजनेचे दूषित पाणी पाजणार असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.

फोटो : वडगाव शेरी भागात भामा आसखेड योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मागील आठ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे.