शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

विमाननगरला भामा-आसखेडचा दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:10 IST

चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, ...

चंदननगर : मोठा गाजावाजा करत भामाआसखेडचे पाणी वडगाव शेरी मतदारसंघातील विमाननगर, धानोरी, लोहगाव, येरवडा, वडगावशेरी या भागात आले. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई राष्ट्रवादी व भाजपच्या नेत्यांनी केल्याने आज दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.

गेल्या महिन्यात १ जानेवारीला मुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत भामा-आसखेड योजनेच्या पाण्याची सुरुवात केली. भामा-आसखेड योजनेतून वडगाव शेरी मतदार संघासाठी पाणीपुरवठा होणार आहे. मात्र, केवळ उद्घाटनाची घाई केल्यामुळे आज नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. योजना आम्ही पूर्ण केली असे ढोल बडवणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे नेते, कार्यकर्ते आठ दिवस झाले विविध भागात दूषित पाणीपुरवठा होत असताना गप्प का ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या योजनेचे श्रेय लाटण्यासाठी केलेल्या घाईमुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना तपासणी करण्यास पूर्ण वेळ मिळाला नाही.

याबाबत पाणीपुरवठा अधिकारी रमेश वाघमारे व दत्ता तांबारे यांच्या संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास

विमाननगरमधील यमुनानगर, भीमनगर विमाननगर या भागातील ७०० हून अधिक घरांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मनपा प्रशासनाच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने नागरिकांना गॅस्ट्रो सारखे आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना जुलाब-उलट्याचा त्रास होत असल्याचे यमुनानगरमधील रहिवासी विनोद बनसोडे यांनी सांगितले. मात्र, तरीदेखील पाणीपुरवठा अधिकारी किंवा कोणत्याही स्थानिक नगरसेवकांनी लक्ष न घातल्याने नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

... तर आम्ही अधिकाऱ्यांना दूषित पाणी पाजणार

पाणीपुरवठा अधिकारी यांना लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत स्वच्छ पाणीपुरवठा न झाल्यास आम्ही अधिकाऱ्यांना भामा आसखेड योजनेचे दूषित पाणी पाजणार असल्याचे कल्पेश यादव यांनी सांगितले.

फोटो : वडगाव शेरी भागात भामा आसखेड योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, मागील आठ दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे.