शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दूषित रासायनिक सांडपाणी सोडले शेतात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे सोलापुर महामार्गावरील दुषित पाण्याची चारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे सोलापुर महामार्गावरील दुषित पाण्याची चारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फोडून प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत सर्व रासायनिक दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात व कुरकुंभ गावातील ओढ्यात सोडून दिले. त्यामुळे पहाटे केलेल्या या कारवाईवर शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कुठलाही तोडगा न काढता रासायनिक दुषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पुढचे पाऊल उचलत पाण्याची चारी पुन्हा बुजवण्याचा निश्चय केल्याने गेली तीन महिन्यापासून सुरू असलेले हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

तहसीलदार, प्रांताधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ, सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. दुषित पाणी प्रकल्पातून राजरोसपणे सोडले जात असताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांचा, ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्याचे काम प्रशासनाने केल्याने याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

वाहतुकीच्या निर्माण झालेल्या समस्येमुळे रस्ते प्रशासन व तत्सम अधिकाऱ्यांना ही कारवाई करावी लागल्याची माहीती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. दुषित पाण्यामुळे शेकडो एकर शेतीचा उपयोग शून्य झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दुषित झाले आहे. कुठल्याही प्रकारची भरपाई देने तर दूरच उलट दडपशाहीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भांडवलशाही धार्जिणे प्रशासन

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात सुरू झालेल्या रासायनिक प्रकल्पातून उत्सर्जित होत असलेले वायु प्रदूषण व दुषित पाण्याच्या प्रदूषणाने उच्छाद मांडून गेली वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. प्रदूषण करणाऱ्या विविध कंपनी प्रशासनाच्या विरोधात हजारो पुरावे आजवर विविध स्तरावर देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बाधित शेतकरी व ग्रामस्थांना कायदा सुव्यस्थेच्या नावाखाली दडपशाहीने गपगार करुन भांडवलशाही समोर नतमस्तक होण्यात धन्यता मानण्याचे काम भांडवलशाही धार्जिणे प्रशासन करीत आहे.

फोटो ओळ : पुणे सोलापूर महामार्गावरील चारी फोडल्यामुळे शेतात रासायनिक दुषित पाण्याचे तळे निर्माण झाले आहे.