शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

संविधान हे सर्व जाती-धर्मांतील जनतेसाठी- श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:50 IST

आंबेडकर विचार मंच साहित्य संमेलनाचे उद्घाटन

सासवड : सध्या देशात समता आणि स्वातंत्र्य आहे; परंतु बंधुत्व आहे का, हे तपासावे लागेल. कारण बंधुत्व असेल तर लोक एकमेकांना गोळ्या घालणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धर्मापुरते मर्यादित नाहीत. त्यांनी लिहिलेले संविधान हे संपूर्ण देशातील सर्व जाती-धर्मांतील जनतेसाठी आहे. त्याला कोणतेही कुंकू नाही. संविधानाचे खरे मारेकरी अशा साहित्य संमेलनांमधून शोधावे लागतील, असे परखड मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.सूर्य मावळला, की काजव्यांचे राज्य सुरू होते आणि आपण कृत्रिम प्रकाशात राहतो. त्यामुळे आपण सूर्यप्रकाशाकडे जायचे की कृत्रिम प्रकाशात राहायचे, हे ठरविले पाहिजे. अलीकडच्या काळात सांस्कृतिक आणि जातीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वांचे अवमूल्यन होत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.सासवड (ता. पुरंदर) येथे सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्याचे माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागताध्यक्ष पंकज धिवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य प्रकाश पवार, सासवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिगंबर दुगार्डे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंकज धिवार, कामगार नेते ज्ञानदेव घोणे, गटविकास अधिकारी संतोष हराळे, भीमराव कांबळे, राजेश चव्हाण, संदीप बनसोडे, दादासाहेब गायकवाड, रवींद्र वाघमारे, स्वप्निल घोडके आदी उपस्थित होते.दुपारच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘बौद्धेतरांशिवायचे कार्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. रमेश जाधव, डॉ. संभाजी मलघे, ज्येष्ठ साहित्यिक अन्वर राजन यांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या ‘मी वादळवारा’ या संगीतमय कार्यक्रमाने संमेलनाची सांगता झाली.सासवड येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलनाच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव सन्मान’ या वेळी भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ यांना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाजसेवा सन्मान), ज्येष्ठ उद्योजक नामदेवआबा जगताप यांना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट व्यावसायिक सेवा सन्मान).पत्रकार गणेश मुळीक यांना या वर्षापासून दिला जाणारा पहिला (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता) सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला गेला.

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीस