शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

धोरण बदलताना विद्यार्थ्यांचे मत विचारात घ्या

By admin | Updated: February 15, 2016 02:48 IST

केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या धोरणामध्ये बदल करताना शासनाने व आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मतही विचारात घ्यायला हवे

पुणे : केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या धोरणामध्ये बदल करताना शासनाने व आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मतही विचारात घ्यायला हवे, असे मत राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले. स्टडी सर्कलच्या वतीने आयोजित सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ. आनंद पाटील, स्वागताध्यक्ष विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते.स्पर्धा परीक्षेच्या लेखी परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांनी मुलाखतीकडेही लक्ष दिले पाहिजे. मुलाखतीमध्ये उमेदवाराची हुशारी, शहाणपणा, देहबोली, सच्चेपणा, दुसऱ्यांच्या दु:खाबाबत असलेली सहानुभूती, एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदी गोष्टी तपासल्या जातात, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी हा या क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असल्याने परीक्षांमध्ये बदल करताना त्यांचे मत विचारात घ्यायला हवे. काही वर्षांपासून प्रशासनाची कामाची पद्धत आणि विविध सेवा वाढल्या आहेत. परिणामी प्रशासकीय पदांची संख्याही वाढली आहे.’’डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ‘‘सामाजिक बांधिलकी प्रत्येक तरुणाने जपली पाहिजे. उत्तम अधिकारी होण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविण्यासाठी तुम्हाला समाजाच्या गरजा, अपेक्षा व समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढता आला पाहिजे.’’