शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

धोरण बदलताना विद्यार्थ्यांचे मत विचारात घ्या

By admin | Updated: February 15, 2016 02:48 IST

केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या धोरणामध्ये बदल करताना शासनाने व आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मतही विचारात घ्यायला हवे

पुणे : केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या धोरणामध्ये बदल करताना शासनाने व आयोगाच्या पदाधिकाऱ्यांनी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे मतही विचारात घ्यायला हवे, असे मत राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले. स्टडी सर्कलच्या वतीने आयोजित सातव्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, यूपीएससीचे माजी अध्यक्ष डी. पी. अग्रवाल, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, साहित्य संमेलनाचे निमंत्रक डॉ. आनंद पाटील, स्वागताध्यक्ष विनोद शिरसाठ आदी उपस्थित होते.स्पर्धा परीक्षेच्या लेखी परीक्षेबरोबरच विद्यार्थ्यांनी मुलाखतीकडेही लक्ष दिले पाहिजे. मुलाखतीमध्ये उमेदवाराची हुशारी, शहाणपणा, देहबोली, सच्चेपणा, दुसऱ्यांच्या दु:खाबाबत असलेली सहानुभूती, एखाद्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदी गोष्टी तपासल्या जातात, असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी हा या क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असल्याने परीक्षांमध्ये बदल करताना त्यांचे मत विचारात घ्यायला हवे. काही वर्षांपासून प्रशासनाची कामाची पद्धत आणि विविध सेवा वाढल्या आहेत. परिणामी प्रशासकीय पदांची संख्याही वाढली आहे.’’डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, ‘‘सामाजिक बांधिलकी प्रत्येक तरुणाने जपली पाहिजे. उत्तम अधिकारी होण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविण्यासाठी तुम्हाला समाजाच्या गरजा, अपेक्षा व समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढता आला पाहिजे.’’